अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरण: तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाची मंजुरी; आज दुपारी 1 वाजेपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता – Mumbai News


अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात ठाणे पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलेल्या बदलापूर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणीसाठी मंजूर केली आहे. वडिलांनी दाखल केलेल्या अंतरिम अर्जात म्ह

.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे सोमवारी सायंकाळी एन्काउंटर झाले. पण त्यानंतर अद्याप त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे पार्थिव दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण स्थानिकांच्या विरोधकामुळे हे अद्याप शक्य झाले नाही. आता पोलिसांच्या मदतीने त्याच्या दफनविधीसाठी जागा शोधली जात आहे. दरम्यान, अक्षयच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याचीही मागणी केली आहे. त्यात अक्षयच्या वडिलांनी न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेवर 2 चिमुकल्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्याचे सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आले. या घटनेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः उच्च न्यायालयानेही या घटनेला एन्काउंटर मानता येणार नाही असे निरीक्षण नोंदवले आहे. या सर्व राजकारणात अक्षयचे पार्थिव अजून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहे.

राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….

नाशिक, पालघर, धुळ्यात आज ऑरेंज अलर्ट:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिजोरदार तर जळगावमध्ये मध्यम पावसाचा अंदाज

नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज अतिजोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मुंबईत मध्यम, नगर, जळगावमध्ये हलका ते मध्यम, पुणे, साताऱ्यात जोरदार तर विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…

अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नाही:तर शिंदेंना मिळालेली मते भाजपची असल्याची संजय राऊत यांची टीका

अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने राज्याच्या तक्तावर तकलादू माणसे बसवले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगजेबाप्रमाणे शहा देखील महाराष्ट्रावर आक्रमण करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्र सगळ्यांचा माज उतरव होतो, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…

महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो!:उद्धव ठाकरे गटाची जहरी टीका; शहांच्या वक्तव्यांवरुन साधला निशाणा

​​​​​​​

महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24