काटा चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये, अशा शब्दात महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि मंत्री नितेश राणे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. मुस्लिम बहुल भागामध्ये लोकांना मारुन दाखवण्याचे आव्हान नितेश राण
.
प्रसार माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता. त्या वेळी त्यांनी पोलिस माता भगिनींवर हात उचलला होता. त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्र निर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. त्यावेळी सर्व भाजपचे नेते शेपट्या घालून बसले होते. केवळ मनसेने मोर्चा काढला होता. मनसे त्यांना सरळ भिडली होती. त्यामुळे काटा-चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या, ते शिकवू नये. असा टोला देखील त्यांनी मंत्र नितेश राणे यांनी लगावला आहे.
या वेळी त्यांनी व्यापाऱ्यांना ही गंभीर इशारा दिला आहे. व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. अशा कडक शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी कालच्या मीरा-भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात कोणती भाषा चालते? हे व्यापाऱ्याला माहीत नव्हते का? अशा पद्धतीने महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर काना-खालीच बसेल. व्यापारी आहात, व्यापार करायला आला आहात, व्यापार करा. त्यांनी नसत्या भानगडीत नाक खुपसू नये. नाहीतर व्यापार सोडून, दुकानाच्या काचा बदलत बसावे लागेल, हे लक्षात ठेवा. असा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…