राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे शासकिय सेवेत समायोजन करावे यामागणीसाठी हिंगोलीतील ५५० कर्मचाऱ्यांनी सोमवारी ता. ३० असहकार लक्षवेध आंदोलन केले. या आंदोलनामुळे आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कामकाज ठप्प झाले होते. शासनाने या मागणीकडे
.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे १५ हजारपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, लेखापाल, अधिपरिचारीका, परिचारीका, डाटा एन्ट्री ऑपरेटर यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यभरातील या कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने ता. १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे निश्चित केले. मात्र दिड वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही समायोजन झाले नाही. त्यामुळे आज राज्यभर लक्षवेध असहकार आंदोलन करण्यात आले.
त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील ५५० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शंकर तावडे, जिल्हा लेखा अधिकारी श्रीपाद गारुडी, पी. एस. गिरी, एन. ए. बुर्से, एस. एस. करेवार, बी. आर. खेबाळे, बी. डी. शेळके, दीपक पवार, पी. व्ही बेले, शेख मुनाफ, आर. टी. पुंडगे, पी. एल. कुलकर्णी, बालाजी उबाळे, डॉ. शारदा मेश्राम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमाेर लक्षवेध असहकार आंदोलन केले. या आंदोलनामुळे आरोग्य विभागाचे जिल्हयातील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास ता. १० जुलै पासून आणखी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.