मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हिंदी सक्ती करण्याचे शासन निर्णय मागे घेतले. पण त्यानंतरही राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहे
.
ठाकरेंनी मराठी माणसांच्या पोटापाण्यासाठी काय केले?
नारायण राणे आपल्या एका पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदी भाषेच्या वादावरून विविध प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रनेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले?
मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?
मराठीबद्दल इतकेच प्रेम होते, तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
5 जुलैला विजयोत्सव -उद्धव ठाकरे
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीचे जीआर रद्द केल्याप्रकरणी 5 जुलै रोजी विजयोत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, 5 जुलै रोजी विजयोत्सव साजरा केला जाईल. आम्ही सर्वांशी संवाद साधत आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात आमच्यासह सर्वजण एकत्र उतरले होते. तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवात दाखवण्याची गरज आहे. या सरकारने सुरूवातीला मराठी – अमराठी करत मराठी भाषिकांत फूट पाडण्याचा डाव रचला होता. मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आणि त्यानंतर त्याचा फायदा घ्यायचा. पण मराठी भाषिकांत फूट पडत नसल्याचे दिसताच त्यांनी मराठी माणूस एकत्र येऊ म्हणून त्यांनी हा जीआर रद्द केला आहे.
कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती का?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचा उल्लेख कमळी असा केला. ते म्हणाले, या सरकारच्या मंत्र्यांचे रोज कोणते न कोणते पापं बाहेर येत आहेत. शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहेत. आदित्य ठाकरे यांनी काल-परवा अकरावीच्या प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर सरकारने प्रवेश यादी जाहीर केली. मला उत्सुकता आहे की, ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली. कारण मार्क्स मिळाले शंभर पैकी शंभर ही कमळी आमची एक नंबर. आता ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली? त्या कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती का? तिने 100 मार्क कसे मिळवले? या 100 मार्गात तिने ईव्हीएम वापरले होते का? हे पाहण्याची मला उत्सुकता आहे. त्यामुळे कमळी एक नंबर आहे असे म्हणणारे कोण आहेत? हे मला पाहायचे आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी भाजपवर शरसंधान साधताना म्हणाले.