डोमकावळे कावकाव करतायत उद्धव-राज ठाकरेंच्या मोर्च्यावरून राऊतांचा सरकारला टोला: म्हणाले- रावणांना रामराज्याचा तिटकारा – Mumbai News



शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात ठाम भूमिका घेत, ठाकरे बंधूंनी मराठीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे स्वागत केले आहे. “हेच खरे संकेत आहेत. याला ‘बिटवीन द लाईन्स’ म्हणतात,” असं राऊत म्हणाले. त्यांनी सरकारला इशारा द

.

राऊत यांनी जोरदार टीका करत म्हटले की, सरकारने जर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील गोष्ट स्वीकारत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला तर आम्ही त्यांचे स्वागत करु. लोकभावनेपुढे सरकारला झुकावेच लागते, असेही त्यांनी अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर बोलताना म्हटले आहे.

रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच

संजय राऊत म्हणाले की, माझी किती भाकीत खरे झाले आणि त्यामुळे ते मंत्री झाले 3 वर्षांपूर्वी हे त्यांना पक्के माहिती आहे. हा विषय राजकीय भाकिताचा नसून राजकीय अकलनाचा आहे. मिंदे गटात जाणारे लोकं हे बालबुद्धीचे लोकं आहेत.हिंदीची सक्ती जशी होत आहे तशी पक्ष सोडण्याची सक्ती त्यांच्यावर अमित शहांनी केली आणि त्याविरोधात ते उभे राहू शकले नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असताना या लोकांना पोट दुखण्याचे कारण नाही. तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आले आहात, मराठी द्वेषातून एकत्र आले आहात. आम्ही मराठी अन महाराष्ट्रासाठी एकत्र येत आहोत. रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच.उदय सामंत यांनी कमीत कमी बोलावे यातच त्यांचे हित आहे. हा डामराचा व्यवहार नाही मराठी भाषेचा व्यवहार आहे.

लोकभावनेपुढे सरकारला झुकावे लागते

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही डोमकावळे कावकाव करत आहे त्यांनी काही बोलू नये. त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. सरकार जर हिंदी सक्ती रद्द करणार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करु, ही महाराष्ट्रातील जनतेची भूमिका आहे. जनतेने सांगितले आहे की आम्हाला ही सक्ती मान्य नाही,हे सरकार स्वीकारत त्यावर काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचे स्वागत करू. लोक भावनेपुढे सरकारला झुकावे लागते असेही राऊतांनी म्हटले आहे.

अब्दुल फक्त पंक्चर काढत नाही!

संजय राऊत म्हणाले की, इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांनी इस्रायलबरोबरचे युद्ध जिंकले. त्यात अमेरिकेलाही अद्दल घडवली. इस्रायलचे आयर्न डोम वगैरे दंतकथाच ठरले. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील मुसलमानांची चेष्टा केली होती. हे लोक पंक्चरच काढू शकतात हे त्यांचे म्हणणे, पण अब्दुल क्षेपणास्त्रही बनवतो व प्रे. ट्रम्प, नेतान्याहूलाही धडा शिकवतो. तो सरेंडरही होत नाही हे इराणच्या विजयाने दाखवून दिले, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विजयानंतरही इराणचा ‘सुप्रीम लीडर’ नम्र

संजय राऊत म्हणाले की, इराणने युद्ध जिंकले आहे. युद्धाचे विश्लेषण कोणी कोणत्याही पद्धतीने करो, पण 86 वर्षांच्या अयातुल्लाह खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणच्या जनतेने एकाच वेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि प्रे. ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून दिली. खामेनी यांच्या संघर्षामुळे इराण एक सार्वभौम राष्ट्र म्हणून पुन्हा जगासमोर आले. इतक्या मोठ्या विजयानंतरही इराणचा हा ‘सुप्रीम लीडर’ नम्र आहे. जनता व जग त्यांचा ‘जय’ करीत आहे, पण खामेनी स्वतःला विश्वगुरू मानत नाहीत. त्यांनी तेहरानला रोड शो केले नाहीत, ‘फौजी’ गणवेश घालून फोटोसेशन केले नाही. त्यांनी देशाच्या दुश्मनांशी युद्ध केले. ते जिंकले. इतिहास लढणाऱ्यांना लक्षात ठेवतो. खामेनी लढले. आतापर्यंत ‘द ग्रेट बिटन’ असे म्हटले जात असे. आता इराणही ‘ग्रेट’ झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24