त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र येत थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान दरम्यान विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात
.
या आंदोलनाला आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा पाठिंबा मिळाला असून, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्यिक, सांस्कृतिक कार्यकर्ते, अभ्यासक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
मनसेकडून लोकलमध्ये साधला जातोय संवाद
दरम्यान, मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक दिली जात आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे दादर रेल्वे स्थानकात नागरिकांशी संपर्क साधणार आहेत.
मराठी स्वाभिमानासाठी एकत्र येणे स्वागतार्ह- सतेज पाटील
दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी देखील या मोर्चाबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात सक्तीची हिंदी लादली जात असल्याचा आरोप होत असताना, मराठी भाषेच्या रक्षणासाठी आता एक महत्त्वाचा मोर्चा एकजूटीनं निघण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार असल्याचं स्पष्ट होताच, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आमची भूमिका सकारात्मक असेल- वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांनी कुठल्याही बॅनर शिवाय मराठी वाचवण्यासाठी आणि हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोन्ही भावाचे निमंत्रण आले तर आम्ही भूमिका मांडू, आमची भूमिका ही सकारात्मक असेल.