कांद्याचे सतत बदलते दर ही उत्पादक शेतकऱ्यांसमाेर माेठी समस्या आहे. मात्र देशातील बाजारात चव आणि दर्जा यामुळे ‘नाशिक कांदा’ हा ब्रँड तयार झाला आहे. दराच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय म्हणून पणन विभागातर्फे त्याचे देशातील बाजारपेठेत मार्केटिंग करण्यात य
.
‘दिव्य मराठी’ नाशिक कार्यालयाच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त ‘दहा दिवस, दहा मंत्री’ या विशेष संवाद उपक्रमात सहभागी हाेत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील उद्याेग, कृषी व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. रावल यावेळी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा, येवल्याची पैठणी यांचेही मार्केटिंग केले जाईल. कुंभमेळा ही पर्यटनासाठी सर्वात चांगील संधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी त्र्यंबकेश्वर-शिर्डी-शनि शिंगणापूर सर्किट विकसित करण्याचा प्रयत्न मी केला. नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या पर्यटन त्रिकाेणाबाबतही विद्यमान पर्यटन मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही रावल म्हणाले.

नरेंद्र गाेलिया, उद्याेजक, ऋषभ इन्स्ट्रूमेंटस प्रश्न : नाशिकला पर्यटकांचे 10 ते 12 दिवस वास्तव्य असेल, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यासाठी काय करता येईल? जयकुमार रावल यांचे उत्तर : फक्त नाशिकचा विचार न करता मी पर्यटनमंत्री असताना त्र्यंबकेश्वर-शिर्डी-शनि शिंगणापूर सर्किट विकसित करण्याचा प्रयत्न केला. पायाभूत सुविधांसह रस्ते व हवाई वाहतुकीचे जाळे त्यासाठी हवे.
हेमंत राठी, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स प्रश्न : आपण पर्यटनमंत्री राहिला हाेतात. पर्यटन विकासासाठी नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक त्रिकाेण करता येईल का? उत्तर : नक्की करता येईल. पावसाळी पर्यटनाबराेबरच या भागातील निसर्ग पर्यटकांना खुणावताे. तेथे साहसी खेळांना प्राधान्य देता येईल. आगामी काळात त्यासाठी विशेष याेजना आखण्यासाठी पर्यटनमंत्र्यांशी चर्चा करू.
विलास शिंदे , सह्याद्री फार्म अँड ॲग्री प्रश्न : कांद्याचा भाव या सततच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययाेजना काय हाेऊ शकेल? कांद्यावर प्रक्रिया हाेईल का? उत्तर : ‘नाशिक कांदा’ हा बँ्रड तयार झाला आहे. त्यामुळे पणन विभागातर्फे त्याचे परराज्यात मार्केटिंग सुरू करू. शेतकरी व बचतगटांना कांदा ड्राय करण्यासाठी साेलर पॅनल देण्यात येतील.
विवेक गोगटे, माजी अध्यक्ष, निमा प्रश्न : नाशिक जिल्ह्यात पर्यटनाला अमाप संधी आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल? उत्तर : इगतपुरी,भावली धरण परिसर इको टुरिझम व्हिलेज म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न मी केला होता. 7-8 वर्षात फार्म, इको, ॲग्री टुरिझम नावारूपास आले आहे. कुंभमेळा ही पर्यटन विकासाची माेठी पर्वणी साधता येईल.
संदीप कारखानीस, व्यवस्थापकीय संचालक, एएमटी इन्स्टिट्यूट प्रश्न : कुंभमेळ्यात अनेक स्वयंसेवक संस्था, टुरिस्ट गाइड काम करतील. त्यांच्यासाठी प्रथमाेपचार, अग्निशामक यंत्रणा या सुविधा देता येतील का? उत्तर : कुंभमेळा ही पर्यटनासाठी सर्वात चांगली संधी आहे. त्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटना, व्यक्ती यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, हे राज्य शासनाचे प्रथम ध्येय आहे.
सुधीर मुतालिक, सीआयआय प्रश्न : ‘वन डिस्ट्रिक्ट-वन प्राॅडक्ट’ या याेजनेत नाशिकचा बेदाणा, पैठणी याला पणन विभागातर्फे कसे प्राेत्साहन देता येईल? माॅल हाेऊ शकताे का? उत्तर : फ्रान्समधील रुंगीसच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यात इंटरनॅशनल फूड मार्केेट उभारण्यात येईल. त्यासाठी इकाे सिस्टिमवर काम सुरू आहे. त्यात जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पैठणी व बेदाणा यांचाही समावेश केला जाईल. कांतीलाल चाेपडा, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स प्रश्न : प्रवासी आणि उद्याेजकांच्या साेयीसाठी पाडळी येथे पर्यायी रेल्वेलाइन सुरू केल्यास फायदा हाेईल. त्यासाठी काय करावे लागेल? उत्तर : या मार्गाशी संबंधित जे काही फायदे आहेत, ते स्पष्ट करून त्याबाबतचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. मी ही रेल्वेलाइन सुरू करण्याबाबत लगेचच संबंधितांकडे पाठपुरावा करीन.

नाशकात इंटरनॅशनल फूड मार्केट उभारणार
नाशिक जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे इंटरनॅशनल फूड मार्केट उभारण्याचे नियाेजन आहे. त्यासाठी इको सिस्टिमवर काम सुरू असून येत्या चार वर्षांत ते उभारले जाईल, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. ‘दिव्य मराठी’ नाशिक कार्यालयाच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त ‘दहा दिवस, दहा मंत्री’ या विशेष संवाद उपक्रमास उपस्थित राहून त्यांनी उद्याेग, कृषी व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांशी साधलेला हा संवाद…
- पणन महामंडळाचा पहिला फूड माॅल उत्तर महाराष्ट्रात उभारणार
- फळबागा, वाढवण बंदर, कार्गो सेवा, पाेर्ट ही चेन सुरु करणार
- बचत गट, सहकारी संस्थांसह फार्म यांच्या उत्पादनांचे पणन
- त्र्यंबकेश्वर-शिर्डी- शनि शिंगणापूर सर्किटसाठी रस्ते, हवाई वाहतुकीचे जाळे हवे
- ‘नाशिक कांदा’ हा ब्रँड तयार, त्याचे परराज्यात मार्केटिंगही करणार
- कांदा निर्जलीकरणासाठी साेलर पॅनल पुरविण्यात येतील.
- शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी इकाे सिस्टिमवर काम सुरू.
- पाडळी पर्यायी रेल्वे लाइनबाबत प्रस्ताव द्या, त्याबाबत संबंधितांकडे त्वरित पाठपुरावा केला जाईल.
- 03 अब्ज डाॅलरची कृषी उत्पादने गेल्या आर्थिक वर्षात निर्यात
- 30 हून अधिक देशांमध्ये पाेहाेचली नाशिकची द्राक्ष
- 500 काेटी रुपयांचा हापूस आंबा यावर्षी परदेशात रवाना

आजची फळे दुसऱ्याच दिवशी सकाळी दुबईत डायनिंग टेबलवर
फ्रान्समधील पॅरिसमध्ये रुंगीस हे सर्वात मोठे ताज्या फळांचे मार्केट आहे. त्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे इंटरनॅशनल फूड मार्केट उभारणार असून समृद्धी महामार्गाच्या शेवटी व वाढवण बंदराजवळ ते उभारले जाईल. त्यासाठी इको सिस्टिमवर काम सुरू आहे. दुबई काॅमर्सचे चेअरमन यांच्याशी चर्चा झाली असून नाशिकमधील आजची ताजी फळे दुसऱ्याच दिवशी सकाळी दुबईतील नागरिकांच्या डायनिंग टेबलवर असतील, अशी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे रावल म्हणाले.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उत्पादनांची बाजारपेठ विस्तारणार
उत्तर महाराष्ट्रात नाशिकबराेबरच धुळे, नंदुरबार व जळगाव हे प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हे आहेत. येथील द्राक्ष, कांदा, कापूस, मिरची, केळी यांसारखी शेतकी उत्पादने हंगामी आहेत. या शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी व त्यापासून दीर्घकाळ टिकतील अशी उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्याेग व त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन विभागातर्फे विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. ही सर्वच कृषी उत्पादने व बेदाणा, केळीचे वेफर्स यांसारखी देशभर प्रख्यात असून त्यांचे परराज्यांमध्ये मार्केटिंग आणि मागणीनुसार तेथे पुरवठा याेग्य पद्धतीने करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जाईल. तसेच दुबईतही ही उत्पादने त्वरित पाठवता यावीत व तेथील बाजारपेठेत ती त्वरित पाेहाेचावीत, यासाठी पणन विभाग दीर्घकालीन विशेष यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.