शहरी व जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्युत सेवा देणाऱ्या एजन्सी फक्त बिलिंगसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
.
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेडने विद्युत पोल उभारण्यासाठी, रोहित्र बदलण्यासाठी आणि विद्युत तारा लावण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सी काडीमात्र काम करत नाही. शेतकरी आपल्या पातळीवर या कामासाठी खाजगी व्यावसायिकांना पैसे देऊन हे काम करून घेतात. शेतकरी या कामांसाठी आपल्या पातळीवर स्वतंत्र्यरीत्या पैसे देऊन काम करून घेत असेल तर महावितरण नियुक्त केलेल्या कंपन्या फक्त धंदे करण्यासाठी नियुक्ती केल्या का? असा प्रश्न दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला.
अधिकाऱ्यांची घेतली बैठक
जिल्ह्यातील वीज वितरणातील समस्या, वीज वाहतूक, तुटलेल्या तारा, अनियमित वीजपुरवठा, नादुरुस्त विद्युत तारा, नादुरुस्त रोहित्रांची वाहतूक व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संबंधित समस्यांबाबत शुक्रवार रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. जिल्ह्यात बीज बाबत निर्माण झालेल्या अनेक समस्यांची हकीकत संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून त्या तातडीने मार्गी लावण्याची सूचना दानवे यांनी केल्या. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका, विभाग व गाव पातळीवरील विविध समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर मांडून लक्षात आणून दिल्या.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, जगन्नाथ पवार, अविनाश पाटील,तालुकाप्रमुख मनोज पेरे पाटील, शंकरराव ठोंबरे, सोमनाथ करपे, राजू वरकड, संजय मोटे, विष्णु जाधव, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विशाल खंडागळे, यांची उपस्थिती होती.