मराठीसाठी 5 जुलैचा मोर्चा ठरणार ‘सोनियाचा दिन’: त्या दिवशी बऱ्याच जणांना त्रास होईल, मनसेच्या प्रकाश महाजन यांचा दावा – Chhatrapati Sambhajinagar News



राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 तारखेच्या मोर्च्यात एकत्र येणार असून ते सोनियाचा दिवस असणार आहे. मराठीसाठी सर्व जण एकत्र आले हे दृश्य ज्यावेळेस जगाला दिसेल त्यावेळेस बऱ्याच जणांना त्रास होईल, असे मनसेचे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

.

प्रकाश महाजन म्हणाले की, ठाकरे बंधू जर एकत्र मोर्चा काढत असतील तर चांगली गोष्ट आहे, 5 तारखेला याची प्रचिती येईल. असे झाल तर तो मराठी भाषेसाठी सुदिन असेल. मराठीसाठी जो आमच्या मोर्चात मराठी म्हणून येणार आहे त्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो.

..तरच देश टिकेल

प्रकाश महाजन म्हणाले की, मनसे-उबाठाच्या युतीबद्दल मी भाष्य करणार नाही. पण मराठीसाठी जर सगळे एकत्र आले तर खूप चांगले आहे. बाकी युती हा भविष्याचा मुद्दा त्याचा आपण आज काय भविष्य सांगावे जे आहे ते मराठीसाठी एकत्र यावे. 5 तारखेचा मोर्चा हा केवळ मराठीसाठी असणार आहे. यात काहीही राजकीय अजेंडा नाही. मराठी टिकली तर महाराष्ट्र टिकेल अन् महाराष्ट्र टिकला तर राष्ट्र टिकेल हे ज्यांना समजले आहे ते सर्व लोकं मोर्चासाठी येतील. त्यांचे आम्ही स्वागत करु.

मोर्चानंतर मराठी माणसाला सुरक्षित वाटेल

प्रकाश महाजन म्हणाले की, मराठी माणूस मराठीसाठी एक आहे हे दृश्य जेव्हा मोर्चातून दिसेल तेव्हा सरकारला विचार करावा लागेल. राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र मोर्चानंतर राज्यातील मराठी माणूस रस्त्यावर स्वाभिमानाने चालताना दिसेल. त्यांच्यावर कुणीही कसली जबरदस्ती करु शकणार नाही. प्रत्येक मराठी माणसाला आपण सुरक्षित आहोत ही भावना येईल.ती येणं गरजेचे आहे.

भाषेच्या प्रश्नावर का होईना बंधू एकत्र

प्रकाश महाजन म्हणाले की, भाषेच्या प्रश्नावर का होईना, हे दोघे बंधू एकत्र आलेत.आज मला बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांची आठवण आली. त्यांना किती आनंद झाला असेल.मी स्वतः खूप उत्सुक आहे की, ती 5 जुलैची तारीख कधी येतेय आणि मी सगळं पाहतोय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24