शहरात भगवान जगन्नाथ यांचा रथयात्रा महोत्सव शुक्रवार, २७ जून ते ६ जुलै या कालावधीत साजरा केला जाणार आहे. यंदाही जगदिश्वर संस्थानाद्वारे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला शोभायात्रेद्वारे सुरुवात होणार आहे. भगवान जगन्नाथ त्यांच्या भक्तांसह आ
.
रंगारी गल्ली येथील जगदिश्वर संस्थानातून शुक्रवारी दुपारी ४ वाजता रथातून भगवान जगन्नाथ थोरले बंधू बलभद्र व धाकटी बहीण सुभद्रासह धनराज लेन, सक्करसाथ चौक, जवाहर गेट मार्ग, सरोज चौक मार्गाने जयस्तंभ चौक, मालविय चौकापर्यंत येतील. येथे आचार्य निवासस्थानी येतील. त्याचप्रमाणे ६ जुलै रोजी दु. ४ वाजता भगवान जगन्नाथ आचार्य निवास येथून रंगारी गल्लीतील जगदिश्वर मंदिराकडे प्रस्थान करतील. ही रथयात्रा जयस्तंभ चौक, राजकमल चौक, अंबागेट, दहीसाथ, भाजीबाजार, सक्करसाथ मार्गे जगदिश मंदिर, रंगारी गल्ली येथे पोहोचेल. येथे रथयात्रेचा समारोप होईल. रथयात्रेत सहभागी होऊन भाविकांनी जगन्नाथाचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे. २७ जून रोजीच जगन्नाथ पुरी येथील प्रसिद्ध रथयात्रा आयोजित केली जाते.
बलभद्र यांच्या रथाला तालध्वज, देवी सुभद्रा यांच्या रथाला दर्पदलन व भगवान जगन्नाथ यांच्या रथाला नंदीघोष असे नाव आहे. तिन्ही रथांचे नाव जसे वेगळे आहे तसेच या तिन्ही रथांना खेचणाऱ्या मोठ्या दोरखंडांनाही नाव देण्यात आले आहे. भगवान जगन्नाथ यांच्या रथाच्या दोरखंडाला शंखचुडा नाडी, बलभद्र यांच्या रथाच्या दोरखंडाला वासुकी आणि देवी सुभद्रा यांच्या रथाच्या दोरखंडाला स्वर्णचुडा नाडी असे म्हणतात. भाविक हे तिन्ही रथ दोरखंडांद्वारे खेचतात. यामुळे भाविकांना पुण्य लाभ होतो, अशी मान्यता आहे. शहरात दरवर्षी ही रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेत एकाच रथात भगवान जगन्नाथ, बलभद्र व देवी सुभद्रा विराजमान असतात. वेगवेगळे रथ वापरले जात नाहीत. शहरात शिस्तीत तसेच भक्तिभावात रथयात्रेचे आयोजन केले जाते. रथाला बांधलेला दोरखंड भाविक खेचतात. त्यानुसार रथ पुढे सरकतो. शहरातील विविध चौकांमध्ये फुलांचा वर्षाव करून रथयात्रेचे स्वागत केले जाणार आहे. त्याचप्रमाणे भाविकांना प्रसाद व नाश्ताही वितरित केला जाणार आहे. दुपारी रंगारी गल्लीतून निघालेली रथयात्रा रात्री मालविय चौकात पोहोचते.
शिस्त अन् भक्तिभावात रथयात्रेचे होणार आयोजन