आणीबाणीच्या ५० वर्षांनिमित्त पुण्यात कार्यक्रम: संविधान व लोकशाहीचा गळा घोटणारा काळा दिवस, सुहासराव हिरेमठ यांचे मत – Pune News



पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात भाजप पुणे शहर यांच्यावतीने आणीबाणीच्या ५० वर्षांनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी आणीबाणीच्या काळातील अनुभव सांगितले.

.

हिरेमठ यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांना बांगलादेश स्वातंत्र्यानंतर मोठा सन्मान मिळाला. त्यानंतर १९७१ मध्ये मुदतपूर्व निवडणुकीत त्यांना बहुमत मिळाले. मात्र एकहाती सत्तेमुळे भ्रष्टाचार वाढला. जनतेकडून आंदोलने सुरू झाली.

इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांचे पद धोक्यात आले. त्यामुळे त्यांनी आणीबाणीचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवून रात्रीच मंजूर करून घेतला. ‘मिसा’ कायद्यानुसार विनावॉरंट अटका सुरू झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली गेली.सत्याग्रही यांचा अमानुष छळ करण्यात आला. ब्रिटिश काळात इंग्रज यांनी स्वातंत्रसेनानी यांचा छळ केला नाही तेवढा आणीबाणी काळात केला गेला असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.

घाटे म्हणाले, आणीबाणीला ५० वर्ष झाल्याबद्दल ज्यांनी आणीबाणी मध्ये ज्यांनी सहभाग घेऊन सत्याग्रह केला, कारागृहात शिक्षा भोगावी लागली त्यांचा सन्मान आज करण्यात येत आहे. आणीबाणीचा विषय नवीन पिढी समोर मांडला जावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याकाळात आपण देशातील सत्ता विरुद्ध जी चळवळ उभी केली त्याबाबत आज आठवण करण्याचा दिवस आहे.

कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी खासदार प्रदीप रावत, अनिल शिरोळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी आणीबाणीत शिक्षा भोगलेल्या ३०० पेक्षा अधिक व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. अनुपमा लिमये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24