पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न!: महिला पोलिसाचा विनयभंग करणारा मोकाट, राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? – Pune News



पुण्यातील भाजपच्या नेत्याने महिला पोलिस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. प्रमोद कोंढरे असे या आरोपी नेत्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच दुसऱ्या घटनेत महापालिकेतील महिला

.

महिला PSIला दोन वेळा लज्जा निर्माण होईल असा स्पर्श

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 23 जून रोजी पुण्यात काही रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी कसबा पेठचे आमदार हेमंत रासने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शनिवारवाड्याच्या परिसरात उपस्थित होते. यावेळी कार्यरत असलेल्या पोलिसांना चहा पिण्यास बोलावण्यात आले होते. सर्वजण चहा पिण्यासाठी गेले असताना तिथे प्रमोद कोंढरे देखील होता. यावेळी त्याने महिला पोलिस निरीक्षकाच्या मागून दोन वेळा लज्जा निर्माण होईल असा स्पर्श केला. त्यानंतर महिला पोलिस निरीक्षकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि संपूर्ण प्रकरण पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर घातला. त्यानंतर प्रमोद कोंढरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी देखील करण्यात आली, परंतु अटक करण्यात आली नाही.

महापालिकेतील महिला अधिकाऱ्यानेही दिली विनयभंगाची तक्रार

दुसऱ्या प्रकरणात, पुणे महापालिकेतील आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याने भाजपच्या कामगार विभागाचा पदाधिकारी ओंकार कदमवर विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. ओंकार कदमकडून दीड वर्षांपासून छळ होत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. ओंकार कदम त्याच्या सहकाऱ्यांसह कार्यालयात येऊन द्विअर्थी बोलत असल्याचे, तसेच अरे-तूरेची भाषा वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती प्रसार माध्यमांनी दाखवल्यावर ओंकार कदमवर शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, यालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?

दरम्यान, पुण्यात मध्यंतरीच्या काळात गुन्हेगारी चांगलीच फोफावलेली असताना पुणे पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपींना अटक केली होती. विनयभंगाच्या देखील अनेक घटना घडल्या त्यात देखील आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु, इथे महिला पोलिस निरीक्षकाचाच विनयभंग झाला तरी आरोपीला अटक नाही. त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यात महिला पोलिसच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रसार माध्यमांनी याप्रकरणी पोलिसांना विचारणा केली असता कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या शिक्षेची तरतूद असल्याने अटकेची गरज वाटत नसल्याचे कारण पुणे पोलिस खासगीत देत असल्याचे समजते. परंतु, ही पळवाट आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24