देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कॉरिडॉरची उभारणी नाशिकमध्ये होत आहे. छत्रपती संभाजीनगर त्या कॉरिडॉरचा भाग असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२५ जून) केली. एकेकाळी केवळ धार्मिक आणि कृषी केंद्र म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता संरक्ष
.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरणाची मागणी
उद्योग संवादमधील चर्चासत्रात छत्रपती संभाजीनगर फर्स्टचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सीएमआयए सचिव अथर्वेशराज नंदावत, माजी अध्यक्ष सुनील रायठठ्ठा, मसिआचे माजी अध्यक्ष किरण जगताप, टर्टल इंडियाचे संचालक भरत गिते, स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष योगेश मानधनी यांनी सहभाग घेतला. त्यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरणाची मागणी केली. मानधनी म्हणाले की जालन्यात आज ७० लाख टन स्टील निर्मिती होते. योग्य धोरण व सवलती मिळाल्यास या क्षेत्रात भविष्यात मोठी वाढ शक्य आहे.
देशाच्या जीडीपीत राज्याचा वाटा १४%
महाराष्ट्र देशाच्या जीडीपीत १४ टक्क्यांहून अधिक योगदान देणारे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १.६४ लाख कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीसह देशातील एकूण एफडीआयपैकी ४० टक्के वाटा मिळवला आहे.
संभाजीनगर ईव्ही राजधानीच्या दिशेने
गडचिरोली : एकेकाळी उद्योगशून्य असलेला हा जिल्हा आता नवीन ‘स्टील हब’ बनत आहे, जिथे देशाच्या एक तृतीयांश स्टील उत्पादनाचे लक्ष्य आहे. अमरावती : ‘पीएम मित्रा’ उपक्रमांतर्गत भारताची सर्वात स्मार्ट कापड परिसंस्था (टेक्स्टाइल इकोसिस्टिम) विकसित होत आहे, ‘कापसापासून फॅशनपर्यंत’ संपूर्ण मूल्य साखळी तयार केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर : गेल्या १० वर्षांत भारताचे पहिले स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून विकसित झाले असून लवकरच ते देशाची ‘ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेइकल) राजधानी’ बनण्याच्या मार्गावर आहे. वाढवण बंदर : जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे आणि जगातील पहिल्या १० मोठ्या बंदरांपैकी एक असणारे वाढवण बंदर महाराष्ट्राला लॉजिस्टिक्समध्ये २० वर्षे पुढे नेईल, नाशिकसह किमान २० जिल्ह्यांना थेट जोडेल आणि वाहतूक खर्च कमी करेल.
संरक्षण उद्योगाचे केंद्र
संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान कंपन्यांची स्थापना होऊन नाशिकला ‘डिफेन्स हब’ म्हणून ओळख मिळेल. रोजगार निर्मिती उच्च कुशल व अकुशल कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्मिती. आर्थिक चालना स्थानिक व्यवसायांना चालना, पूरक उद्योगांची वाढ होईल आणि जिल्ह्याच्या जीडीपीत वाढ होईल. जागतिक ओळख संरक्षण क्षेत्रात नाशिकची जागतिक स्तरावर ओळख होईल, भविष्यात अधिक गुंतवणूक आकर्षित होईल. नाशिकला संरक्षण कॉरिडॉर, अहिल्यानगरचाही समावेश