पिकांना धोका: मृग संपूनही अजिंठा डोंगररांगांमध्ये दमदार पावसाअभावी वाघूर कोरडी, वाकोदसह परिसरात शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आभाळाकडे‎ – Jalgaon News



मान्सून आला खरा; पण नुसतेच ढगाळ वातावरण! मृग नक्षत्रात दरवर्षी पेरणी केल्या जाते. परंतु यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरूवात झाली असूनही २१ तारखेला मृग संपला तरीही समाधानकारक पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची आर्द्रा नक्षत्रातही कोणतीही चाहू

.

हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी व इतरही व्यक्ती पेरणीचे किंवा इतर कार्याचे नियोजन आखतो. जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तो अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, जिल्ह्यात पावसाची समाधानकारक जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे कृषी केंद्र धारकांनी बियाणे खरेदी करून विक्रीकरिता उपलब्ध करून दिली. परंतु कोरडवाहूचा शेतकरी फिरकत नसल्याने बियाण्यांची खरेदी मंदावली आहे. ८० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, असे कृषी विभागाने सांगितले आहे. हजेरी रुसली. हवामान खात्याचे अंदाज चुकत असल्याने जनसामान्यात नाराजीची भावना दिसत आहे. पावसाचा अंदाज डोक्यात ठेवून संपूर्ण नियोजन आखले जाते. ८० ते १०० मिलिमीटर पावसाशिवाय पेरणी करू नका. वातावरणाचा अभ्यास घेऊनच पेरणीचे नियोजन करा. जमिनीत किमान वितभर ओल मुरल्यावरच पेरणीचे नियोजन करा, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

बियाणे विक्री मंदावली

मृग नक्षत्र संपले, पाण्याचा पत्ताच नाही मृग नक्षत्रानंतर बऱ्यापैकी पावसाला आरंभ होतो. परंतु यंदा मृग नक्षत्र पूर्ण होऊनही कोरडेच आहे. काही शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेऊन कोरडवाहूची पेरणी केली. मात्र पावसाचा थांगपत्ता दिसत नसल्याने आकाशाकडे नजरा लागल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24