शिंदेंच्या शिवसेनेचा आणखी एक नेता राज ठाकरेंची भेट घेणार का?: हिंदी विषयावरचा वाद मिटवण्याचा सरकारचा प्रयत्न – Mumbai News



राज्यातील शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर हिंदी शिकवण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह साहित्यिक, भाषा तज्ज्ञ व अन्य संबंधितांशी प्रत्यक्ष चर्चा करण्

.

मंत्री दादा भुसे म्हणाले की, हिंदीच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसून, विद्यार्थ्यांचे भविष्यातील शैक्षणिक हित लक्षात घेऊनच अभ्यासपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांचे हित कसे जपले जाईल, याचे सविस्तर सादरीकरण विरोधकांना, साहित्यिकांना आणि नागरिकांना करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक भेट घेऊन देणार माहिती

दादा भुसे म्हणाले म्हणाले की, कोणाचीही गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही थेट संवाद साधणार आहोत. ज्यांना काही शंका किंवा तक्रारी आहेत, त्यांच्याशी वैयक्तिक भेट घेऊन सर्व माहिती समोर मांडली जाईल. यामुळे सकारात्मक आणि सर्वसमावेशक निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हिंदीच्या मुद्यावरुन राज ठाकरेंनी विरोध केल्याने मंत्री दादा भुसे त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मराठी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही

दादा भुसे म्हणाले म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करताना मराठी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. नवे धोरण राबवताना राज्याच्या परिस्थितीचा विचार केला जाईल आणि सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

…तर कडक कारवाई करणार

दादा भुसे म्हणाले की, राज्यातील शाळांबाबत शासन अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. विदर्भात ज्या पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या, त्यावेळी राज्यपाल, लोकप्रतिनिधी आणि पालकवर्ग विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष हजर होते. त्यामुळे त्या भागातील पटसंख्या वाढत असून शिक्षणाबाबतचा विश्वासही वाढला आहे. राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून, शिक्षणाला केवळ व्यवसाय म्हणून पाहणाऱ्यांवर आता कडक नियमावली लादली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात ‘आदर्श शाळा’ तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, जिथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा, स्मार्ट क्लास, डिजिटल साधने आणि पोषक शैक्षणिक वातावरण मिळणार आहे, अशी माहिती मंत्री भुसेंनी दिली. जिथे वेगळी परिस्थाती असेल तिथे कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24