इम्तियाज यांच्या विरोधात जनआक्रोश: आंबेडकरवादी संघटनांचा भर पावसात मोर्चा, इम्तियाज जलील यांना 7 दिवसांत अटक करण्याचा अल्टिमेटम – Chhatrapati Sambhajinagar News



शहरातून राज्यात गेलेल्या जय भीम, जय मिम या पॅटर्नला संभाजीनगरात तडा गेला आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक का होत नाही? त्यांना ७ दिवसांच्या आत अटक करा, अशी मागणी घेऊन आंबेडकरवादी संघटनांनी सोमवारी (२३

.

आयोजित मोर्चात भीमसैनिक सहभागी झाले होते. या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तर विविध संघटनांच्या नेत्यांनी समारोपीय भाषणे केली. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम, अरुण बोर्डे, मिलिंद शेळके, संजय ठोकळ, अफसर खान, अमित भुईगळ, जालिंदर शेंडगे यांच्यासह विविध संघटनांच्या नेत्यांनी या मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

इम्तियाज : मोर्चा मंत्र्यांना वाचवण्यासाठी

इम्तियाज : लाखो येणार होते. पोलिस म्हणतात अडीच हजार. मग लाखो लोक कुठे गेले? शिरसाट : इम्तियाज हे डोक्यावर पडले आहेत. पोलिसांनी त्यांना आकडा दिला का? इम्तियाज : हा मोर्चा पैसे देऊन मंत्र्याला वाचवण्यासाठी होता. शिरसाट : ही समाजाची बदनामी आहे. लोक स्वत: मोर्चात आले. त्याने स्वत: समाजाला जाऊन विचारावे. इम्तियाज : आजच्या मोर्चाने दलित चळवळ कमजोर केली. शिरसाट : येथील जनता जागृत आहे. निजामाच्या औलादीने आम्हाला हे सांगू नये. त्यांचा ब्लँकमेल करण्याचा धंदा आहे. त्याच्या टीकेला काहीही महत्त्व उरले नाही.

राजकीय आरोपांच्या फैरी

समारोपाच्या व्यासपीठावर विविध संघटनांच्या नेत्यांनी या वेळी भाषणे केली. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, इम्तियाज जलील हे सेटलमेंट करणारे नेते, विधानसभेत दुसऱ्याला फायदा होण्यासाठी त्यांनी तडजोडी केल्या. आंबेडकरी समाजाच्या मतावर निवडून आल्यानंतर समाजाची बदनामी करणारे नेते, असे अनेक आरोप त्यांच्यावर केले.

जेथून नारा… तेथेच तडा…

राजकारणातील वेगळा प्रयोग २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाला. पहिल्यांदा एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित आले. जय भीम आणि जय मिमचे नारे देण्यात आले होते. या लाटेत इम्तियाज जलील निवडून आले. मात्र ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सोलापुरात पराभव झाला. त्यानंतर ही आघाडी तुटली. असे असतानादेखील एमआयएमकडून सातत्याने हा नारा सुरूच राहिला. राजकीय विश्लेषकांच्या मते या मोर्चामुळे एमआयएमकडे असलेला आंबेडकरी समाज काही प्रमाणात जाऊ शकतो. आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रभाग असल्यामुळे एमआयएमच्या मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाचे एकगठ्ठा मतपेटीला या माध्यमातून खिंडारदेखील पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी होणार असल्याची चिन्हे आहेत. कुठल्या शब्दांमुळे समाजाचा अपमान होतो हे खासदार म्हणून राहिलेल्या व्यक्तीला चांगले माहिती आहे. मात्र तरीही असे बोलून जाणीवपूर्वक हे वाक्य बोलले गेले. समाजाच्या भावना यामुळे दुखवल्या गेल्या आहेत आशा भावना आंबेडकरवादी नेत्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

अटकेची आवश्यकता विशद करावी लागेल

ॲट्राॅसिटीत गुन्ह्याचे स्वरूप पाहून अटक करण्यात येते. तपास अधिकाऱ्यावर ही बाब अवलंबून असते. या कलमान्वये ६ महिने ते ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. अटकेची आवश्यकता न्यायालयासमोर विशद करावी लागते. त्याचे कारण सादर करावे लागते. यात कुठलीही जप्ती नाही, ताब्यात घेण्याची गरज नसते. संबंधित व्यक्ती पळून जाऊ शकतो का? हा विचार करून पोलिसांनी हा निर्णय घेणे गरजेचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24