शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांनंतर शिंदे गटातील नेते रामदास कदम चांगेलेच आक्रमक झाले आहेत. रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी प
.
रामदास कदम यांनी 2009 साली निवडणुकीत विजयासाठी अघोरी पूजा केली होती, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, असे कदम म्हणालेत. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते, असेही त्यांनी सांगितले.
नेमके काय म्हणाले रामदास कदम?
शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जावून आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तुम्ही येवू नका, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात.
गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त 1200 मतांनी निवडून आलेले आहेत, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला.
बाळासाहेबांना सांगून तिकीट द्यायला लावले
भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते, असाही दावा रामदास कदम यांनी केला. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडून शिकावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
सुषमा अंधारेंचे रामदास कदमांवर टीकास्र
दरम्यान, भास्कर जाधवांवर केलेल्या टीकेवर सुषमा अंधारेंनी रामदास कदमांवर टीकास्र सोडले. भास्कर जाधवांवर बोलण्याची रामदास कदम यांची लायकी नाही. डोळ्याला बाम लावून रडणाऱ्या बामदासने स्वतःच्या मुलाला मंत्रिपद मिळावे म्हणून जी वारंवार नौटंकी केली त्यांना भास्कर दादा सारख्या स्वाभिमानी नेतृत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.