Afzal Khan history : सत्तेसाठी भावांची हत्या करणारा पित्याकडून ताज हिसकावून घेणारा सर्वात क्रूर आणि भयानक शासक म्हणून औरंगजेब ओळखला जातो. मात्र, अफजलखान हा औरंगजेबपेक्षा क्रूर आणि भयानक होता होता. अफजलखान याने त्याच्या 63 पत्नींच्या 63 कबरी बांधल्या होत्या. जिवंतपणीच त्यान एक करुन त्यांना या कबरीत आणुन दफन केलं. महाराष्ट्राजवळच या कबरी आहेत.
अफजल खान असे या क्रूर सरदाराचे नाव आहे. साताऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे. महाबळेश्वरच्या जटांत आणि पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी बांधलेला बुलंद किल्ला म्हणजे प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. हा इतिहास सर्वांनाच माहित आहे. मात्र, अफजलखानाचा इतिहास यापेक्षा भयानक आहे. महाराष्ट्राजवळ असलेल्या एका ठिकाणी अफजखानाच्या 63 पत्नींच्या कबरी आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक बार्डरजवळ विजापूरमधील एक चबुतऱ्यात कबरींच्या सात रांगा आहेत. पहिल्या चार रांगांमध्ये अकरा, पाचव्या रांगेत पाच आणि सहाव्या आणि सातव्या रांगेत सात अशा एकूण 63 कबरी आहेत. या सर्व कबरी अफजखानाच्या 63 पत्नींच्या आहेत. त्याने त्याच्या सर्व 63 बायका जिवंत असतानाच या कबरी बांधल्या होत्या.
अफजल खानाने त्याच्या 32 बायकांची हत्या का केली?
जिथ या कंबरी आहेत त्या ठिकाणा ‘साठ कबरी’ या नावानं ओळखलं जातं. 1668 पर्यंत हे शहर आदिलशाहीची राजधानी होतं. विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती असलेल्या अफजल खानाने आदिलशाहीचा विस्तार दक्षिणेत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1659 मध्ये विजापूरचा सुलतान अली आदिल शाह दुसरा याने अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यास पाठवलं होतं. या मोहिमेवर जाण्याआधी अफजल खानाला ज्योतिषांनी तू युद्धातून जिवंत माघारी येणार नाही असे सांगितले होते. ज्योतिषांनी सांगितलेल्या भविष्यवाणीचा अफजल खानावर इतका प्रभाव पडला होता की, ज्या दिवशी त्याने या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी प्रस्थान केलं, तोच दिवस कबरीच्या दगडावर आपल्या मृत्यूचा दिवस म्हणून लिहिला होता. या मोहिमेतून जिवंत परतणार नाही. त्यामुळेच त्याने आपल्या 63 पत्नींचा विजापूर जवळ अफजलपुरा इथं ठार मारलं. आपल्या पत्नींनी इतर कोणाशीही लग्न करू नये यासाठी शिवाजी महाराजांविरुद्धच्या मोहिमेआधी अफजल खानाने त्यांना ठार केलं असं सांगितले जाते. हेन्री कझिन्स यांच्या ‘बिजापूर : द ओल्ड कॅपिटल ऑफ द आदिलशाही किंग्स’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे. इथं एकून 64 कबरी आहेत. यापैकी एक कबर रिकामी आहे.