मराठी हा मुद्दा आहे का? लोक फाल्तू गोष्टी बोलतात: भाषेबद्दल बोलताना अबू आझमींचे अजब विधान, हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले – Mumbai News



राज्यातील शाळांमध्ये प्राथमिक स्तरावरून हिंदी शिकवण्याच्या निर्णयानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मराठी भाषेबाबत बोलताना तोल गेल्याचे पाहायला मिळाले. मराठी हा मुद्दा आह

.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा मोठ्या जोमाने उपस्थित केला आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षणात हिंदीला स्थान दिल्याने मनसेसह अनेक मराठीप्रेमी संघटनांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषेच्या अधिकारांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप करत, मनसेने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. प्राथमिक स्तरावरून हिंदी शिकवण्यास तीव्र विरोध होत आहे.

नेमके काय म्हणाले अबू आझमी?

भाषेच्या वादावर बोलताना अबू आझमी यांनी “मराठी हा मुद्दा आहे का? लोक बकवास बोलतात” असे अजब विधान केले. तसेच महाराष्ट्रात जे राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकराचे कामही हिंदीतूनच चालते

हिंदी भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘भाषा अशी असली पाहिजे की कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तिचा सन्मान झाला पाहिजे. तर एक त्या त्या राज्यातील भाषेचाही सन्मान झाला पाहिजे. संसदेत एक कमिटी आहे, भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत. ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे संपूर्ण काम हिंदीमध्ये केले जाते, असेही अबू आझमी म्हणाले.

… मग तिसरी भाषा कोणती वापरायची?

जर महाराष्ट्रात तीन भाषा असतील तर पहिली मराठी असावी. दुसरी भाषा हिंदी आणि नंतर इंग्रजी असावी. जर महाराष्ट्रात हिंदी ही तिसरी भाषा नसेल, तर तुम्ही सांगा कोणती भाषा वापरावी? असा प्रश्नही अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे.

हिंदी विरोधात बोलणे राज ठाकरेंचा नेहमीचा धंदा

दरम्यान, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांवरही अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे बंधु एकाच घरात जन्माला आले असतील तर सोबत राहतील, त्यात आम्हालाही आनंद आहे. असे आझमी म्हणाले. ‘राज ठाकरेंची सध्या काही ताकद नाही, ते फक्त द्वेषाचे राजकारण करतात. उत्तर भारतीयांविरोधात आणि हिंदी विरोधात बोलणे हा त्यांचा नेहमीचा धंदा झाला असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा…

हिंदीच्या सक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस Vs मनसे:राज्यात उर्दू चालते, मग हिंदी का नाही? संग्राम जगताप यांनी केला हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध

पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या निर्णयाला विरोध करणाऱ्या मनसेवर सडकून टीका करत ‘राज्यात तुम्हाला उर्दू चालते, मग हिंदी का नाही?’ असा कटू सवाल उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *