आखाडा बाळापूर येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी सोमवारी ता. 23 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिवंत प्रेत यात्रा आंदोलन करण्यात आले.
.
आखाडा बाळापूर येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण होत आहे. या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. त्यानंतर तहसील प्रशासनाने मोजणी करून जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल देखील सादर केला आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागेबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीवन यात्रा आंदोलन केले.
यावेळी माणिक पंडित, विठ्ठल पंडित, राहुल पंडित,आनंद पंडित, सुभाष खाडे, प्रमोद बलखंडे, विनोद थोरात, भगवान धुळे, अशोक खिल्लारे, सम्राट खिल्लारे, विजय पंडित, सुरज खिल्लारे, निवृत्ती नरवाडे, दीपक सोनाळे, रामराव पंडित, अविनाश सोनाळे, दिगंबर थोरात यांची उपस्थिती होती.
प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने जागा देण्याबाबत तहसील कार्यालयाला आवश्यक सूचना द्याव्यात व जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.