Hindi Compulsory: मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नेतृत्वाखाली हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली आहे. दादरच्या IES शाळेच्या बाहेर हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. आम्ही सरळ मार्गाने आंदोलन करत आहोत तोपर्यत सरकारने तोपर्यंत दखल Iघ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नये अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असे आव्हान यावेळी संदीप देशपांडे यांनी काढले.
सह्यांच्या या मोहिमेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय. महाराष्ट्रात 2 भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. बैठकीमध्ये त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. सध्या सकारात्मक तसा जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याचा रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरण सरकारला कठीण होत असेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. लोकांची संभ्रमावस्था दूर करणं हे सरकारच कर्तव्य आहे. त्यांनी ते केला पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार असल्याचेही देशपांडे म्हणाले.
आमदार संग्राम जगताप डोक्यावर पडलेत का? महाराष्ट्रात उर्दू चालते असा मी कधी म्हणालो? डोक्यावर पडलाय का संग्राम? कुठे उर्दू शिकवली जाते विचारात शाळांमध्ये शिकवली जाते का? त्यांच्या स्वतःच्या शाळेमध्ये ती शिकवली जात असेल कदाचित, असा टोला त्यांनी लगावला.
हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न होतोय. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करतेय. सर्व मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. फक्त नऊ वाजता बोलबच्चगिरी करून काही होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा असे आवाहन त्यांनी केले.
अबू आझमींना पुन्हा एकदा कानाखाली
सर्व षंढ लोक सरकारमध्ये बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय? असा प्रश्न यावेळी संदीप देशपांडे यांनी विचारला. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचादेखील समाचार घेतला. त्यांना पडलेली कानाखाली ते विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही, असे देशपांडे म्हणाले.
महाराष्ट्राचं दुर्दैव
सरकारला अजूनही हिंदी बद्दल का प्रेम आहे ? कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय हे तुम्ही विसरून नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे. हेच मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.