ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश: उबाठा सेनेची अवस्था धोकादायक आणि जीर्ण, मंत्री आशिष शेलार यांचा हल्लाबोल – Mumbai News



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात भाजप जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यां

.

यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे. लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पाहायला मिळेल.

उबाठाची अवस्था धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत, त्यावर तो पक्ष जीर्ण अवस्थेत आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

मुंबईत भाजप 1 नंबरचा पक्ष झाला

2017 च्या निवडणुकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपला फक्त दोन जागा कमी होत्या. आता भाजपमध्ये चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर भाजप नंबर 1 चा पक्ष झालाच. शिवाय मूळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

आमची लढाई देव, देश आणि धर्मासाठी

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला. आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24