Sangali Crime News : पाच दिवसाचे जिवंत बाळ मातीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतातून बाळ रडण्याचा आवाज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. हे बाळ कुणाचे आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या गौरगाव येथे हा प्रकार घडला आहे. चार ते पाच दिवसाच्या जिवंत अर्भकाला मातीत पुरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरुष जातीचा जिवंत अर्भक पुरण्याचा प्रयत्न झाला आहे.
गावातील झांबरे वस्तीवरील असणाऱ्या एका शेतात हा प्रकार घडला आहे. अज्ञाताकडुन जिवंत अर्भकला शेता मध्ये खड्डाकडून पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहिला असता अर्धवट पुरलेल्या अवस्थेत बाळ आढळून आले.
पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी बाळाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला आहे. या निर्दयी घटनेमुळे तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सदर बाळ कोणाचे होते आणि कोणाकडूनही हा प्रकार करण्यात आला याबाबत तासगाव पोलिसांच्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मृत बाळाचा मृतदेह पिशवीत भरुन ST बसमधून नेला
आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळेच पालघर जिल्ह्यातील जोगळवाडी येथील दाम्पत्याच्या अर्भकाचा उपजत मृत्यू झाल्याची घटना नाशिक सिव्हिलमध्ये घडली होती. दरम्यान, पित्याने अर्भकाचा मृतदेह पिशवीतून नेल्याप्रकरणीआरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात चौकशी समिती नेमण्यात आली असून तिला दोन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.. पालघर जिल्ह्यातल्या जोगळवाडी या आदिवासी वाडीवरील दाम्पत्य पालघर जिल्ह्यातील खोडाळा आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. तिथेच त्या बाळाचे ठोके लागत नसल्याचे लक्षात आल्याने तिथून त्या गर्भवती महिलेला अत्यवस्थ अवस्थेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, त्या बाळाचा उपजत मृत्यू झाला होता. ॲम्बुलन्स मिळण्यातील विलंब हा पालघर जिल्ह्यातील खोडाळा आरोग्य केंद्रात ॲम्बुलन्स आधीच रुग्णासाठी बाहेरगावी गेल्याने झाला होता. दरम्यान, अर्भकाच्या उपजत मृत्यूबाबतची माहिती तसेच अंत्यसंस्कार नाशिकलाच करण्याबाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र, पित्याने तो मृतदेह पिशवीत घालून एसटीतून पालघर जिल्ह्यातील गावी नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळेच या प्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीच्या अहवालातून काय समोर येते. यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे..