शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी नवा उपक्रम जाहीर केला आहे. मराठवाड्यात २३ जून रोजी सकाळी ११ वाजता ‘बँकांची शाळा’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
.
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती दिली. बँका शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर आणि थकबाकीची माहिती मागत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी गावागावातील शिवसैनिकांना शेतकऱ्यांसाठी लढण्याचे आवाहन केले आहे. आमदार राहुल पाटील, कैलास पाटील, प्रवीण स्वामी, उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.