खासदार संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. पण आमदारांच्या विरोधामुळे त्यांना ते जमले नाही, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे
.
2022 मध्ये शिवसेनेत झालेली बंडखोरी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. या घटनाक्रमामुळे शिवसेना दोन गटांत विभागली गेली. शिंदेंनी मूळ शिवसेना हस्तगत करून भाजपच्या मदतीने युती सरकार स्थापन केले, तर उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ म्हणून पुढे वाटचाल सुरू केली. या घटनेला 3 वर्षे लोटल्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी उपरोक्त दावा केला आहे.
शहाजी बापू पाटील पंढरपूरमध्ये बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांचा त्यांना विरोध होता. त्यांना येता आले नाही. यामुळेच राऊत आजही चिडचिड करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. सद्यस्थितीत ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य आहे. त्यामुळे लवकरच राज्यात राजकीय घडामोडी घडतील.
..तर राज ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल
गत काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट व मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. शहाजी बापू पाटील यांनी यावेळी या संभाव्य युतीवरही भाष्य केले. सध्या ठाकरे गट व मनसेच्या युतीचा विषय पुढे येत आहे. पण मनसेने काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंशी युती केली, तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचाही दावा केला.
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…
उल्लेखनीय बाब म्हणजे शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. 2022 मध्ये ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओके मधी हाय’ या गावरान शैलीतील डायलॉगमुळे त्यांना सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळाली. शिवसेनेतील बंडखोरीवेळी ते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत फोनवर साधलेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमधील माणदेशी बोली व त्यांच्या रांगड्या शैलीतील भाष्य चांगलेच व्हायरल झाले होते.
हे ही वाचा…
अमोल मिटकरी यांच्या विधानाची चर्चा:म्हणाले – पांडुरंगाच्या मर्जीने उलथापालथ होईल अन् अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील
सोलापूर – महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या वर्षभरात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. पुढील वर्षभरात पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील, असे ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात नवे काय घडणार? असा प्रश्न चर्चिला जात आहे. वाचा सविस्तर