सीबीएसई पॅटर्नमुळे कल जिल्हा परिषद शाळांकडेच‎: आळंद जिल्हा परिषद केंद्रातर्गत पहिल्याच दिवशी 232 विद्यार्थ्यांचा नव्याने प्रवेश‎ – Chhatrapati Sambhajinagar News



फुलंब्री तालुक्यातील आळंद जिल्हा परिषद केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ शाळांमध्ये प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी २३२ विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेतला आहे. सीबीएसई पॅटर्नमुळे आता खाजगी शाळांतील मुले जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागली असल्याचे चित्र आहे.

.

प्रत्येक गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली, सोशल मीडिया, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जाहिरात करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे आळंद जिल्हा परिषद केंद्रांतर्गत येणाऱ्या २२ वस्तीशाळा व त्याअंतर्गत येणाऱ्या आळंद येथील दोन, उमरावती येथील दोन, जळगाव मेटे, महाल किन्होळा, वाकोद, पिंप्री, सताळा, जातवा, खामगाव, नायगव्हाण, निमखेडा, पाडळी, पेंडगाव, गुमसताळा, बोरगाव अर्ज अशा प्रत्येक एक शाळा येतात.त्या सर्व शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी २३२ विध्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला. त्यानंतरदेखील प्रवेश सुरूच आहेत.

आळंद येथील केंद्रात शाळा उघडण्यापूर्वी सर्व शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थी वाढीसाठी काय करावे यासाठी महिती देण्यात आली. या वेळी केंद्रप्रमुख यांच्यासह शिक्षक मागील १५ दिवसांपासून शेतशिवार, गावात, घरोघरी फिरून विध्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतरसुद्धा दोन शिक्षक परिसरात जाऊन विद्यार्थी शोधत आहेत. दुसरीकडे खाजगी संस्थाचालकांनीसुद्धा कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात जाऊन विद्यार्थी संख्या वाढीचे टार्गेट दिले आहे. ^सीबीएसी पर्टन पहिलीच्या वर्गापासून सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये नक्कीच बदल होईल. भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभ्यासक्रमांबद्दल माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी संख्या वाढीसाठी अजूनही प्रयत्न चालू आहे. -संजय भुमे, केंद्रप्रमुख

खाजगी शाळांवर परिणाम : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. सीबीएसई पर्टनमुळे पालकांनी आपल्याला पाल्याला सर्व सुविधा मोफत मिळत आहेत. दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याने खाजगी संस्थांमध्ये मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळामध्ये टाकले आहे. त्यामुळे खाजगी शाळामध्ये विद्यार्थी संख्या घटल्याचे चित्र आहे.

सीबीएसई पॅटर्नमुळे विद्यार्थी वाढले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24