घाटीतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी आयटकच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अभय टाकसाळ यांनी केलेल्या आंदोलनात कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले कोविडमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांन
.
या आंदोलनात सुरक्षारक्षक आणि आंदोलन करणारे कर्मचारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. यावेळी एक महिला देखील तब्येत खराब झाल्यामुळे तिला दवाखान्यात भरती करावे लागले. यावेळी पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले होते.
कोविड काळात थाळ्या वाजवल्या, आता कोणी लक्ष देत नाही
यावेळी अभय टाकसाळ म्हणाले की म्हणाले की, कोविड काळात या योद्ध्यांसाठी टाळ्या – थाळ्या वाजवल्या, दिवे लावले , फुले उधळले. मात्र त्यांच्या थाळीत काही नाही याकडे कोणीही लक्ष देत नाही. आपण त्यांना सेवेत सामावुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी घाटी प्रशासनाकडे केली आहे. कामगारांना संपूर्ण पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपूर्वी मिळत नाही, अशी तक्रारही कामगारांनी युनियनकडे केली आहे. त्याच बरोबर ईएसआयसी व पीएफच्या सेवा देखील कामगारांना मिळत नसल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण कायदेशीर पगार हा प्रत्येक महीन्याच्या ७ तारखेला कामगारांना देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आपल्या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
चुकीच्या पद्धतीने आंदोलन केले
यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले की, कामगारांना पगारसंबंधित कंत्राटदाराकडून दिला जातो. आंदोलनकर्त्यांनी माझी गाडी अडवली पगार झाल्यानंतर पुन्हा आंदोलन करणे योग्य नाही. संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. मात्र त्याचा परिणाम रुग्णसेवर होत असल्याचे फुकरे यांनी सांगितले.