आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. या दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्कामाला आहेत. सध्या संत तुकाराम महाराजांची पालखी तांबोळी मशिदीजवळ पोहोचली आहे. तर संत ज्ञानेश्वर मह
.
वारीत यंदा शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या परंपरेत बदल
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी यंदाच्या आषाढी वारीमध्ये आपली पूर्वीची परंपरा मोडीत काढत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा हे धारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी होणार नाहीत, तर फक्त पालखीचे पुण्यात दर्शन घेऊन आपल्या गावी परतणार आहेत. या निर्णयामागे प्रवासाचा वेळ आणि परतीच्या प्रवासाची अडचण हे कारण सांगण्यात येत आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी शिवाजीनगर परिसरात दाखल झाल्यानंतर धारकऱ्यांनी संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत पालखीचे दर्शन घेतले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी तुकोबांच्या पालखीचे सारथ्यही केल्याचे पाहायला मिळाले.
250 पेक्षा जास्त दिंड्या असलेली पहिलीच वारी
यंदा जवळपास 250 पेक्षा जास्त वारकरी दिंड्यांनी वारीत सहभाग घेतलाय. गेल्यावर्षी हा आकडा 150 ते 170 पर्यंत होता. अशा स्थितीत 250 पेक्षा जास्त दिंड्या असलेली ही पहिलीच वारी ठरली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होत असून पालखी आगमनाचे काही फोटोज आणि व्हिडिओज पाहुया…
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील संगमवाडी येथे आगमनाचे ड्रोन दृश्य
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील संगमवाडी येथे आगमन ड्रोन दृश्य
मंत्री चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तीत दंग














