​​​​​​​इम्तियाज जलील यांच्याकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी कुठून आली?: वंचित बहुजन आघाडीचा सवाल; जलील यांनी शिरसाटांची काढली होती प्रॉपर्टी – Chhatrapati Sambhajinagar News



एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर मालमत्तेसंबंधीचे गंभीर आरोप केले होते. पण आता वंचित बहुजन आघाडीने जलील यांच्यावरच कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी कमावल्याचा आरोप केला आहे. इम्तियाज जलील

.

अफसर खान म्हणाले की, इम्तियाज जलिल यांनी आपल्या पत्नीच्या नावाने खुलताबाद येथे 1 कोटी रुपयांची प्रॉपर्टी घेतली आहे. विशेषतः ते पूर्वी राहत असलेल्या मन्नत क्रमांक एक हे घर कोट्यवधी रुपयांचे होते. पण त्यांनी ते केवळ 95 लाखांत खरेदी केले. याशिवाय त्यांनी ते सध्या राहत असलेल्या मन्नत टू बंगल्यावरही कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.

2 कोटींचे घर अवघ्या 95 लाखांत

इम्तियाज जलील अनेकांना ब्लॅकमेल करतात. लोकांना भीती घालतात. त्यांना 1 लाख रुपयांचे वेतन मिळते. त्यांनी 2 कोटींचे घर अवघ्या 95 लाखांत घेतले. घरावर 2 कोटी खर्च केले. त्यांनी सिडको प्रशासनावर दबाव टाकून हे घर घेतले होते. अवघा 1 लाख पगार असणाऱ्या जलील यांच्याकडे 3 वर्षांत 3 कोटी रुपये कुठून आले? त्यांच्या घराला केवळ 4 हजारांचा टॅक्स लागतो. पण त्यांना त्याहून अधिक कर लागला पाहिजे, असे अफसर खान म्हणाले. खान यांनी यावेळी इम्तियाज जलील यांनी केलेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्याचीही मागणी केली.

संजय शिरसाट जलील यांच्याविरोधात कोर्टात

दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात शेंद्रा औद्योगिक भूखंडासंबंधीच्या आरोपाप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला आहे. त्यावर 24 जून रोजी सुनावणी होणार आहे. शिरसाट यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे की, ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सक्रिय पदाधिकारी आहेत. दोनवेळा नगरसेवक, चौथ्यांदा आमदार पदी निवडून आले आहेत. माजी खा. सय्यद इम्तियाज जलील यांनी 5 जून रोजी पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी मद्य कारखान्यासाठी पुत्र सिद्धांत यांच्या नावे शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड घेतला.

सत्तेचा गैरवापर करीत आरक्षण बदलून त्यांना हा भूखंड घेतल्याचा आरोप केला. याबाबतच्या बातम्या समाज माध्यम आणि दुसऱ्या दिवशी विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या. वास्तविक या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात आपण कोणताही पत्रव्यवहार केला नाही. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांना फोन कॉलही केलेही नाही. जलील यांच्या आरोपामुळे आपली प्रतिमा जनमाणसांत मलिन झाली. यामुळे व्यथित झाल्याचे नमूद केले.

संजय शिरसाट यांनी वकील राजेश रतनलाल काळे यांच्यामार्फत जलील यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक 3 यांच्या न्यायालयात भारतीय न्याय संहिता कलम356(1),(2),3३) आणि जूना अब्रूनुकसानीचा कायदा कलम 500 नुसार फौजदारी खटला दाखल केला. हा खटला 19 जून रोजी सुनावणीसाठी आला होता. मात्र नियमित न्यायाधीश सुटीवर असल्याने या खटल्याची पुढील सुनावणी 24 जून रोजी ठेवण्यात आली आहे.

2 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद

संजय शिरसाट यांनी माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्याविरोधात ज्या कलमानुसार खटला भरला आहे. यात जर जलील हे दोषी ठरले तर त्यांना 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24