मुंबईमधून सध्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, शिर्डी याचबरोबर अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. आता भारतामध्ये आणखी वंदे भारत ट्रेनची भर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई ते मंगळूर यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत असताना, रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई- मंगळूर यामार्गिकेवर नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांची ही मागणी असल्याचे समोर आले आहे.