महाराष्ट्रातील घरगुती वीज बिल स्वस्त होणार



दरमहा काही लोकांना खूप जास्त वीज बिल येते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील (maharashtra) घरगुती वीज दर कमी करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

मागील सरकारच्या काळात, विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळात, कोरोनानंतर वीज बिलांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, आता हे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले की, राज्यातील वीज (electricity) दर दरवर्षी टप्प्याटप्प्याने कमी केले जातील. पहिल्या वर्षीच वीज दर 10 टक्के कमी केले जातील आणि पुढील पाच वर्षांत एकूण 26 टक्के कपात केली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, “ही वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीजदर पहिल्या वर्षी 10 टक्के आणि पुढील 5 वर्षांत 26 टक्क्यांनी कमी केले जातील, महावितरणच्या याचिकेवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत”

राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहक 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात आणि या वर्गाला सर्वाधिक फायदा होईल, म्हणजेच 10 टक्के वीजदर कपात होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत, बळीराजाला दिवसा आणि विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसेच, येत्या काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेला प्राधान्य दिले जाईल, ज्यामुळे वीज खरेदीचा खर्च कमी होईल. यामुळे वीजदर (price) कमी करणे शक्य होणार आहे.”


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24