राज्यातील (maharashtra) नवीन शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य कोणती भाषा शिकायची असल्यास, त्यासाठी 20 विद्यार्थ्यांनी मागणी करणे आवश्यक आहे.
या निर्णयामुळे पहिलीपासूनच हिंदी सक्तीने शिकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भूमिकेमुळे राज्यातील अनेक मराठी भाषिक नागरिकांकडून शासनाचा विरोध होत आहे.
या पार्श्वभूमीवर लेखक, कवी हेमंत दिवटे (hemant divte) यांनी शासनाचा पुरस्कार (award) परत करण्याची घोषणा केली आहे, तर सचिन गोस्वामी आणि खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
राज्य शासनाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पहिलीपासून तिसरी भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. हिंदी भाषेला पर्याय हवा असल्यास, किमान 20 विद्यार्थ्यांची मागणी आवश्यक आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा सक्तीची होण्याची शक्यता आहे.
या निर्णयाला मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांकडून विरोध होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता लेखक, कवी हेमंत दिवटे यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.
“हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून मला पॅरानोया या कवितासंग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करत आहे. सरकारने निर्णय मागे घेतला तरच मी माझा निर्णय मागे घेईन,” असं हेमंत दिवटे म्हणाले आहेत.
हेही वाचा