14 जूनपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता



गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा वेग मंंदावला आहे. तसेच मान्सूनला उशीर होण्याची संभावना दिसून येत आहे. मान्सूनला किमान 15 जूनपर्यंत उशिर होणार आहे. त्यामुळे 14 जूनपर्यंत मुंबईसह (mumbai) पश्चिम किनारपट्टी वगळता राज्याच्या विविध भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान (temperature) जास्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात कमाल तापमान आणखी वाढून 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

तसेच विदर्भाच्या अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

14 जूनपर्यंत राज्यात (maharashtra) सामान्य किंवा मान्सून पावसाची शक्यता नाही. प्रामुख्याने दुपारी पाऊस पडेल आणि काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, जो या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात जास्त असण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत, राज्याच्या इतर भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या काळात कमाल तापमान जास्त राहील आणि सामान्य मान्सून पाऊस अपेक्षित नसल्यामुळे कृषी विभाग शेतकऱ्यांना (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन करत आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24