भात खाण्याची ‘ही’ सवय आतड्या सडवते; 90% लोक करतात ‘ही’ चूक, शिजवताच किती वेळात खावा?


अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारख वाटत नाही. जवळपास प्रत्येकाच्या घरी दररोज भात शिजवला जातो. भात आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. पण हा भात शिजवल्यानंतर किती वेळात आणि कसा खाता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. 

असे अनेक लोक आहेत ज्यांना शिळा भात खायला आवडतो. अगदी सकाळच्या नाश्त्याला देखील काहीजण फोडणीला देऊन भात खातात. पण शिळा म्हणजे एवढंच नव्हे तर अगदी एक तास अगोदर शिजवलेला भात देखील शिळा भात समजला जातो. फ्रिजमध्ये ठेवलेला भात देखील शिळाच असतो. त्यामुळे नक्की कधी शिजवलेला भात खावा, कोणता भात खाण्यासाठी आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. 

भारतातील लोकप्रिय न्यूट्रिशन कोच Ryan Fernando यांनी सांगितलं की, शिळा भात तुमच्या पोटावर काय परिणाम करतो. कारण अशा भातातून Basillus Cereus सारखे बॅक्टेरिया शरीरात शिरकाव करतात. 

कोच यांनी सांगितलं की, हा जीवघेणा विषाणू कच्च्या तांदळात असतो. या बॅक्टेरियावर उष्णतेमुळे कोणता परिणाम होत नाही. अगदी भात शिजवल्यावरही कोणताच परिणाम होत नाही. एवढंच नव्हे तर हा विषाणू वाढण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतो. जेव्हा भात शिळा होतो तेव्हा त्यावर या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढतात. 

कसा वाढतो हा विषाणू?

जेव्हा तांदूळ शिजवला जातो आणि त्याचे तापमान कमी होते तेव्हा हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि विषारी पदार्थ सोडतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भात शिजवल्यानंतर फक्त एका तासाच्या आत हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि भाताला विषारी बनवू लागतात. कोच म्हणाले की या बॅक्टेरियाशी संबंधित सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भात गरम केल्यानंतरही ते मरत नाही. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला वाटत असेल की अन्न गरम केल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील, तर तुम्ही चुकीचे आहात.

शिळा भात खाण्याचे तोटे

बॅक्टेरियापासून कसा बचाव करा? 

जर तुम्हाला हे बॅक्टेरिया पोटात जाण्यापासून रोखायचे असेल तर भात शिजवल्यानंतर लगेच खा. जर तुम्ही ते लगेच खात नसाल तर भात फ्रिजमध्ये ठेवा आणि २४ तासांच्या आत कोणत्याही किंमतीत खा, अन्यथा ते फेकून द्या. डॉक्टरांनी सांगितले की हा जीवाणू पोटात जातो आणि आतड्यांवर हल्ला करतो, ज्यामुळे अन्न विषबाधा, मळमळ, उलट्या आणि अतिसार होऊ शकतो, ज्याला वैद्यकीय भाषेत फ्राइड राइस सिंड्रोम म्हणतात.

तांदूळ जास्त शिजवला जातो आणि अनेकदा खोलीच्या तपमानावर सोडला जातो. जर तांदूळ लवकर थंड आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला नाही तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. एकदा विषारी पदार्थ तयार झाले की ते पुन्हा गरम करूनही नष्ट करता येत नाहीत.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24