लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला..
आपल्या संघर्ष काळाचा किस्सा सांगताना गश्मीर म्हणाला की, ‘त्या दरम्यान मी एकही चित्रपट केला नव्हता. मात्र, त्याआधीच मी लग्न केलं. मी खूप कठीण काळातून जात होतो आणि लग्नासारखा मोठा निर्णय घेतला होता. त्यामागेही कारण होतं. मला गौरी आवडली होती आणि तिच्या सोबत लग्न करण्याचा निर्णय मी घेतला होता. पण दरवेळी हाच विचार करायचो की, थोडं काम करू, चार पैसे येऊ देत, मग लग्न करेन. पण, एका क्षणाला मला असं वाटलं की, लग्न केलं की घरात चार पैसे येतील आणि त्यानंतर आपल्याला सिनेमावर लक्ष केंद्रित करता येईल. अनेकांनी मला असेही सल्ले दिले की, लग्न केल्यानंतर आयुष्यात भावनिक स्थैर्य येईल. पण, हा प्रवास वाटतो तितका सकारात्मक देखील नव्हता.’