वाहनधारकांना खुशखबर..! २० किमीपर्यंत करा टोल फ्री प्रवास, ‘या’ गाड्यांना मिळणाल सवलत, केंद्राची मोठी घोषणा!

चारचाकी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे खासगी वाहनधारकांना लवकरच टोलच्या जाचापासून सुटका मिळणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहनधारकांच्या सुलभ प्रवासासाठी नवीन टोल प्रणाली सुरू केली आहे. या नवीन प्रणालीनुसार, जर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती मार्गावर २० किमीपर्यंत प्रवास करत असाल तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही. मात्र, यासाठी तुमच्या वाहनात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24