Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्टला? यंदा रक्षाबंधनला भद्रकाळ? राखी बांधण्यासाठी हा अचूक शुभ मुहूर्त टाळू नका अन्यथा…


Raksha Bandhan 2025 Date : श्रावणातील दुसरा सण  म्हणजे रक्षाबंधन असून हे भाऊ – बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. यावर्षी रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्ट कधी असणार आहे, याबद्दल संभ्रम आहे. रक्षाबंधनाचा सण हा पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. यंदा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 वाजेपासून 9 ऑगस्टला दुपारी 1:24 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट नेमकी कधी साजरी करायची? तर हिंदू शास्त्रानुसार उदय तिथीनुसार सण साजरे करण्यात येतात. त्यानुसार भावा बहिणीमधील पवित्र नात्याचा हा सण 9 ऑगस्ट शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. (Raksha Bandhan 2025 Date This year Raksha Bandhan is bhadrkal Auspicious time to tie Rakhi)

यंदा रक्षाबंधनला भद्रकाळ? (Raksha Bandhan 2025 bhadrakal)

पंचांगानुसार 8 ऑगस्ट 2025 ला भद्रकाळाची अशुभ छाया संपणार आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ नसणार आहे. 

रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त काय?  (Raksha Bandhan Auspicious)

हिंदू धर्मानुसार प्रत्येक कामासाठी, पूजा आणि शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी सौभाग्य आणि शोभन असे दोन अतिशय शुभ योग असणार आहे. यादिवशी सर्वार्थसिद्धी योग असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार बहिणीने भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5.47 ते दुपारी 1.24 पर्यंत असणार आहे. ज्यांना दुपारी राखी बांधणे शक्य होणार नाही, त्या बहिणी आपल्या भावला यंदा संध्याकाळीही राखी बांधू शकतात. 

राखी पौर्णिमेची कथा काय?

राखी पौर्णिमेमागे अशी कथा सांगितली जाते की, सिकंदर नावाचा पराक्रमी राजा होता. या महत्त्वाकांक्षी राजाने आपल्या भारतावर स्वारी केली. झेलम नदीपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने जिंकला. त्याला पुढे यायचे होते पण पावसाळा असल्याने झेलम नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला उतार पडत नव्हता, पूर ओसरत नव्हता. सिकंदर स्वत: झेलम नदी पाहण्यासाठी पुढे आला. याच वेळी नदीच्या काठावर सावित्री नावाची स्त्री आपले रक्षण व्हावे म्हणून नदीची पूजा करीत होती. नदीला राखी अर्पण करीत होती.

सिकंदराने ते पाहिले मोठ्या कुतुहलाने त्याने सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं. सावित्रीने सिकंदरला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं.

सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराच्या हातात राखी बांधली. सिकंदर सावित्रीचा राखीभाऊ झाला. पुढे सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे, हे सिकंदराला समजले तेव्हा त्याने पोरसला सोडून दिलं. सिकंदराने पोरसराजाचे राज्यगी परत दिलं. अशाप्रकारे सिकंदर सावित्रीचा भाऊ झाल्याने सर्वांचे कल्याण झालं संकट टळलं. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)




Raksha Bandhan 2025 Date : श्रावणातील दुसरा सण  म्हणजे रक्षाबंधन असून हे भाऊ - बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. यावर्षी रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्ट कधी असणार आहे, याबद्दल संभ्रम आहे. रक्षाबंधनाचा सण हा पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. यंदा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 वाजेपासून 9 ऑगस्टला दुपारी 1:24 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट नेमकी कधी साजरी करायची? तर हिंदू शास्त्रानुसार उदय तिथीनुसार सण साजरे करण्यात येतात. त्यानुसार भावा बहिणीमधील पवित्र नात्याचा हा सण 9 ऑगस्ट शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. (Raksha Bandhan 2025 Date This year Raksha Bandhan is bhadrkal Auspicious time to tie Rakhi)

यंदा रक्षाबंधनला भद्रकाळ? (Raksha Bandhan 2025 bhadrakal)

पंचांगानुसार 8 ऑगस्ट 2025 ला भद्रकाळाची अशुभ छाया संपणार आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ नसणार आहे. 

रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त काय?  (Raksha Bandhan Auspicious)

हिंदू धर्मानुसार प्रत्येक कामासाठी, पूजा आणि शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी सौभाग्य आणि शोभन असे दोन अतिशय शुभ योग असणार आहे. यादिवशी सर्वार्थसिद्धी योग असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार बहिणीने भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5.47 ते दुपारी 1.24 पर्यंत असणार आहे. ज्यांना दुपारी राखी बांधणे शक्य होणार नाही, त्या बहिणी आपल्या भावला यंदा संध्याकाळीही राखी बांधू शकतात. 

राखी पौर्णिमेची कथा काय?

राखी पौर्णिमेमागे अशी कथा सांगितली जाते की, सिकंदर नावाचा पराक्रमी राजा होता. या महत्त्वाकांक्षी राजाने आपल्या भारतावर स्वारी केली. झेलम नदीपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने जिंकला. त्याला पुढे यायचे होते पण पावसाळा असल्याने झेलम नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला उतार पडत नव्हता, पूर ओसरत नव्हता. सिकंदर स्वत: झेलम नदी पाहण्यासाठी पुढे आला. याच वेळी नदीच्या काठावर सावित्री नावाची स्त्री आपले रक्षण व्हावे म्हणून नदीची पूजा करीत होती. नदीला राखी अर्पण करीत होती.

सिकंदराने ते पाहिले मोठ्या कुतुहलाने त्याने सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं. सावित्रीने सिकंदरला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं.

सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराच्या हातात राखी बांधली. सिकंदर सावित्रीचा राखीभाऊ झाला. पुढे सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे, हे सिकंदराला समजले तेव्हा त्याने पोरसला सोडून दिलं. सिकंदराने पोरसराजाचे राज्यगी परत दिलं. अशाप्रकारे सिकंदर सावित्रीचा भाऊ झाल्याने सर्वांचे कल्याण झालं संकट टळलं. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)



[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24