हिवाळ्यापूर्वी 15 नवीन AQI केंद्र उभारले जातील



महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई महानगर प्रदेशात (MMR) 15 नवीन एअर कॉलिटी मॉनिटरिंग सिस्टम (CAAQMS) केंद्रे सुरू करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक नवीन केंद्रासाठी 9 कोटी रुपये खर्च येईल. ही नवीन केंद्रे प्रमुख शहरी भागात उभारली जातील. मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी-निजामपूरला प्रत्येकी दोन केंद्रे मिळतील. ठाणे, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीला प्रत्येकी तीन केंद्रे मिळतील.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या डॅशबोर्डनुसार, मुंबईत 26 सक्रिय हवा गुणवत्ता देखरेख केंद्रे आहेत. ही केंद्रे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM), बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि MPCB द्वारे व्यवस्थापित केली जातात.

तथापि, बहुतेक MMR चे कव्हरेज खूपच मर्यादित आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये बिघडणाऱ्या हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) बद्दल चिंता वाढत आहे.

सध्या ठाण्यात कासारवडवली आणि उपवन किल्ला येथे दोन केंद्रे आहेत. भिवंडी (गोकुळ नगर), कल्याण (खडकपाडा), उल्हासनगर (सिद्धी विनायक नगर), विरार (विलांज) आणि मीरा-भाईंदर (भाईंदर पश्चिम) यासारख्या इतर ठिकाणी प्रत्येकी एकच केंद्र आहे. डोंबिवलीत एकही केंद्र नाही.

एमपीसीबीच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, कामाचे आदेश आधीच जारी करण्यात आले आहेत. पुढील महिन्यापासून ही केंद्रे सुरू होतील. या डेटाचा वापर करून खराब हवेची गुणवत्ता असलेले क्षेत्रे ओळखणे आणि हिवाळ्यापूर्वी उपाय करणे हे उद्दिष्ट आहे. 

हिवाळ्यात प्रदूषण पातळी अधिक वाढते. त्यामुळे हिवाळ्यातील प्रदूषणाची पातळी ही एक गंभीर समस्या बनली आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, मुंबईत 92 दिवसांपैकी सुमारे 60 दिवस खराब एक्यूआय नोंदवला गेला.

विशेष म्हणजे, बीएमसीने गेल्या वर्षी मुंबई वायु प्रदूषण कमी करण्याची योजना (एमएपीएमपी) जारी केली होती. यामध्ये रस्त्याची धूळ, कचरा जाळणे आणि बांधकाम उपक्रम यासारख्या प्रमुख प्रदूषण स्रोतांची यादी करण्यात आली.


हेही वाचा

ठाणे: पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प सर्वांसाठी खुला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24