कॉंग्रेसच्या नेत्यांची राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक: आगामी महापालिका निवडणुकीवर चर्चा, हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल – Mumbai News



महापालिका निवडणुका जवळ येत असताना, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज, 30 जून रोजी राजधानी दिल्लीत काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपक

.

या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, पक्ष संघटनात्मक मजबूती आणि राज्यातील सद्य घडामोडी या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात ही बैठक राजधानी दिल्ली येथील कॉंग्रेस मुख्यालयात पार पडली.

तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, हिंदी सक्तीचा विषय नंतरचा भाग आहे. हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही घेतला होता. एक वादळ तयार करण्यासाठी आणि समाज काय म्हणतो हे चाचपण्यासाठी हा निर्णय घेतला होता. भाजप बंच ऑफ थॉटच्या अनुषंगाने सरकार चालवत आहे. विविधतेत एकता त्यांना नष्ट करायची आहे. मराठी ही फक्त भाषा नाही तर ही संस्कृती आहे आणि आम्ही भाजपला त्याच्यासोबत खेळू देणार नाही. हा विषय अधिवेशनात घेतला जाणार हे भाजपला माहीत होते, मात्र ते फ्लोअर मॅनेजमेंटवर चर्चा करायला तयार नसतात.

हे सरकार मुके, बहिरे आणि आंधळे

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे सरकार निवडणुकीत सांगत होते, त्याचे काय झाले? लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, त्याचे काय झाले? हे सरकार मुके, बहिरे आणि आंधळे आहे. तसेच दादा भुसे हे नामधारी मंत्री आहेत, त्यांना याची काहीही नव्हती. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोली चालवली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एक अधिकारी यांनी हे सगळे करत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याबाबत काहीही माहीत नव्हते, असेही सपकाळ म्हणाले.

महाराष्ट्राचा गाळपत्ता करायचा भाजपचा प्रयत्न

महाराष्ट्राचा गाळपत्ता करायचा प्रयत्न हे सरकार करत आहे. क्षेत्रीय अस्तित्व भाजपला मान्य नाही. ‘नमस्ते सदा वत्सले’ म्हणणारा हिंदू ही संकल्पना भाजपला राबवायची आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याविषयी केलेल्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले, त्यांचे हे विधान खूप गंभीर आहे. हे विधान खरे असेल तर नारायण राणे यांना खासदार म्हणून बडतर्फ केले पाहिजे. गोगावले यांच्याकडून माहिती घेऊन 302 नुसार राणे यांच्या परिवारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24