ठाणे-बोरिवली ट्विन टनल 2028 पर्यंत बांधणार



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे-बोरिवली ट्विन टनल हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे, तो पूर्ण झाल्यानंतर, दीड ते दोन तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत पूर्ण होईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झाल्यापासून तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

मुंबईतील विधानभवनातील कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात कडक सूचना दिल्या. या दरम्यान, त्यांनी बहुप्रतिक्षित ठाणे ते बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाच्याव प्रगतीचा आढावा घेतला.

संपूर्ण प्रकल्प कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होईल. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा ट्विन टनल  प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा आणि त्यात सुरक्षितता आणि पर्यावरणीय मानकांचे पूर्णपणे पालन करावे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24