महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजीमहाराजांनी गनिमी काव्याने राज्य केले.याच गनिमीकाव्याने भारतीयजनता पक्ष आगामीनिवडणुकाजिंकणार आहे,असा दावा कौशल्यव उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभातलोढा यांनी केला. ते शुक्रवारी छत्रपतीसंभाजीनगर दौऱ्यावर
.
कार्यकर्ता नाराज झाला तर कायहोते याचा अनुभव आम्हाला आहे. कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही मंत्री, खासदार, आमदार आहोत. येणाऱ्या महापालिका निवडणुका याकार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या असतील. त्यासाठी सर्वांनी तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यानंतरकोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुलसावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे,जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आदींची उपस्थिती होती.
मुंबईत भाजपचाच महापाैर
ठाकरे बंधू मराठी-हिंदी मुद्द्यावरएकत्रितपणे मोर्चा काढत आहेत. यावरलोढा म्हणाले, ते त्यांचे काम आहे. मराठीही आपली भाषा आहे. भाजप राज्यातीलसर्वात मोठा पक्ष आहे. लोकआमच्यासोबत आहेत. मुंबई महापालिकेतभाजपचाच महापौर होईल.
अतुल सावेही असेच जिंकले
पूर्व विधानसभेत अतुल सावेदेखील गनिमी काव्याचा आधार घेत जिंकले. तिसऱ्यांदा अवघड समजली जाणारी निवडणूकही त्यांनी याच आधारावर जिंकल्याचे लाेढा यांनी स्पष्ट केले.