एका शिक्षकाने शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात घडली आहे. या शिक्षकाने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण वर्गात शिक्षकाचा मृतदेह पाहून विद्यार्थ्यांत भितीचे व
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, पाचोरा स्थित सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत ही घटना घडली आहे. रवींद्र भारत महाले असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी सकाळी 10.30 वा. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील एका वर्गात गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी विद्यार्थी मधल्या सुट्टीसाठी वर्गाबाहेर गेले होते. वर्गात कुणीही नव्हते. ही संधी साधून रवींद्र महाले यांनी आत्महत्या केली. सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात परतले असता त्यांना शिक्षक गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. हे पाहून त्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर ही घटना समोर आली.
मानसिक तणावामुळे टोकाचे पाऊल उचलले?
शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ही घटना शाळा सुरू असताना घडल्यामुळे विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. पण तूर्त मानसिक तणावामुळे रवींद्र महाले यांनी आत्महत्या केली असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील रहिवासी होते. ते पाचोरा येथील सुपडू भादु शाळेत कार्यरत होते. गत काही वर्षांपासून ते पाचोरा शहरातीलच गिरा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते. महाले हे त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे व चांगल्या व्यक्तिमत्वामुळे सर्वपरिचित होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शोक व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वाशिम येथे शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीने संपलवे जीवन
दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातील वाघळूद गावात एका तरूणाने सेल्फी काढून विनयभंग केल्यामुळे एका शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपी अभिषेक देशमुख याचा शोध घेत आहेत. मृत तरुणी इयत्ता अकरावीत शिकत होती. तिने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून, पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या घरात घुसून मुलीसोबत सेल्फी काढली. माझ्याशी लग्न कर असे म्हणत तिचा विनयभंग केला. आरोपीच्या याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार केशव वाघ यांनी पीडित तरुणीचा 22 जून रोजी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. सध्या तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा…
मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत?:एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून हिंदीची सक्ती करू नका, अभिनेते सयाजी शिंदेंनी सरकारला सुनावले
मुंबई – महायुती सरकारच्या पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाला आता साहित्य व कला क्षेत्रातूनही विरोध होत आहे. संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्यानंतर आता अभिनेते सयाजी शिंदे यांनीही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याच्या त्रिभाषा धोरणाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणी कोणत्याही एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये, असे ठणकावून सांगितले आहे. वाचा सविस्तर