छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक कर्ज वाटपाची स्थिती चिंताजनक: लक्ष्यांपैकी केवळ 42 टक्के कर्ज वितरण; जिल्हाधिकाऱ्यांचे गावपातळीवर शिबिरे घेण्याचे निर्देश – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजी नगर पीक कर्ज वाटपात आत्तापर्यंत फक्त 42 टक्केच कर्ज वाटप झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मागील पीक कर्जाचे नूतनीकरण व्हावयाचे अद्याप बाकी आहे. अशावेळी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बॅंका, कृषी, सहकार व महसूल यंत्रणांनी म

.

खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. पीक कर्जाचे आतापर्यंत ४२ टक्केच वाटप झालेले आहे. जिल्ह्यातील बॅंकांची आज बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे, उषा पवार तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात केवळ 630 कोटीचे कर्ज वाटप

जिल्ह्यात २०२५ साठी जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ७७० खातेदारांना १५९६ कोटी ६३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत ६३० कोटी ५५ लक्ष रुपये इतकेच म्हणजेच ४२ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. याबाबत बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप जिल्ह्यातील १ लाख८७ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नुतनीकरण व्हावयाचे बाकी आहे. त्यामुळे नव्याने पीक कर्ज देण्यात अडचणी निर्माण होत आहे.

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज दिले जावे

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. पीक कर्ज नूतनीकरणाबाबत शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जावी. ज्या गावात ज्या बॅंकेचे खातेदार असतील त्या गावात संबंधित बॅंकेने पीक कर्जासंदर्भात शिबीर आयोजीत करावे. या शिबिरात गावपातळीवरील महसूल, कृषी, जिल्हा उपनिबंधक इ. विभागांचे अधिकारीही सहभागी होतील. त्या गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नूतनीकरण करुन लगेचच त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना यावेळी स्वामी यांनी दिल्या.

जिल्ह्यात पीक कर्ज वितरण पूर्ण होत नाही, तोवर बॅंकांसाठी पोलीस बंदोबस्त वा पेट्रोलिंग व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबतही प्रशासन विचार करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24