निवृत्तीचा विचार करण्यापेक्षा एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारावे: उदय सामंतांचा भास्कर जाधवांना सल्ला, म्हणाले – माझ्याबद्दल बोलताना मातोश्रीचा राग काढला – Mumbai News



ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटते, असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, शिंदे गटातील नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना निवृत्ती न घेता एकनाथ शि

.

भास्कर जाधव हे शिवसेनेच्या (ठाकरे गट) कोकणातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र अलीकडील काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत मतभेद, खासकरून खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचे संबंध तणावपूर्ण असल्याच्या चर्चा आहेत. जाधव यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राजकारणातून निवृत्ती घ्यावीशी वाटते, असे विधान केल्यामुळे या चर्चांना अधिकच जोर मिळाला. दरम्यान, या सगळ्यावर जाधव यांनी सोमवारी स्पष्टीकरण देत माझ्या नाराजीच्या चर्चा अर्थहीन असल्याचे म्हटले. दुसऱ्या बाजूला जाधव यांना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.

नेमके काय म्हणाले उदय सामंत?

भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणे योग्य नाही, अशी माझी भावना आहे. माझे हे वक्तव्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा टोमणा नाही. ही माझी खरी भावना आहे, असे उदय सामंत म्हणाले. भास्कर जाधव यांनी अनेकदा माझ्यावर टीका केली आहे. माझ्याबद्दल बोलताना मातोश्रीचा राग काढला आहे. मी जवळचा माणूस असल्यामुळे त्यांचे ऐकून घेतो. म्हणूनच माझ्यावर राग काढतात. मात्र, ते जे काही बोलले त्या मातोश्रीच्या भावना होत्या, असेही सामंत यांनी म्हटले. भास्कर जाधव हे मातोश्रीवर प्रचंड नाराज असल्याचे तुम्ही वार्ताहरांनी मला सांगितलं. मी ही त्यावर खुल्या मनाने सांगतो की, भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर आम्हाला आनंद होईल, असा सल्लाही त्यांनी भास्कर जाधवांना दिला.

भास्कर जाधव संजय राऊतांवर नाराज असल्याच्या चर्चा

आमदार भास्कर जाधव व खासदार संजय राऊत यांच्यात वाद असल्याची चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांच्यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, “भाषण करायला मिळालेच पाहिजे, अशी हवा माझ्या डोक्यात गेली नाही. जी हुजुरी करायला मी कुठे गेलो नाही,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे राऊतांना टोला लगावला होता. यावर संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, “उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्या भावना समजून घेतील,” असे म्हटले. ते पुढे म्हणाले, “भास्कर जाधव हे आमचे जिवलग सहकारी आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. ते आता मुंबईत येणार आहेत, आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्याशी संवाद साधतील.”

हे ही वाचा…

ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव नाराज:म्हणाले – पक्षात वशिल्याचा भारी वापर सुरू, निर्णय घेताना कुणीही विचारत नाही

जरा काही झाले तरवा जायचे, वर सुद्धा हल्ली काय उद्योग चालले आहे कळत नाही. एखादा निर्णय घेताना तिथल्या पदाधिकाऱ्यांना विचारले पाहिजे. तिथल्या जबाबदार नेत्याला प्रश्न विचारला पाहिजे. हा भारी वशीला हल्ली लागला आहे असे म्हणत उबाठाच्या कार्यशैलीवर उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *