आवक कमी झाल्यानं भाज्या महागल्या; मेपासून झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याला फटका


भाज्यांचे दर प्रति किलो वीस ते तीस रूपयांनी वाढलेत. नाशिक शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक निम्म्यानं कमी झालीय. परिणामी, दरही वाढलेत. मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाचा फटका भाजीपाल्याला बसलाय. आवक कमी असल्यानं, गेल्या काही दिवसांत बाजारसमितीत जवळपास सर्वच भाज्या प्रतिकिलो वीस ते तीस रुपयांनी महागल्यात. मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्येही नाशिकमधूनच भाजीपाला पुरवला जातो. त्यामुळे इथं भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. याचाही दरांवर परिणाम होतोय, असं व्यापारी सांगत आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24