औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, असे वादग्रस्त विधान मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या विषयावरून गदारोळ उठण्
.
औरंगजेब सर्वधर्म समभाव ठेवणारे व्यक्ती होते
यावेळी बोलताना आसिफ शेख म्हणाले, औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले. ते सर्वधर्म समभाव ठेवणारे आणि तसेच वागणारे होते. मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केले जात आहे. आज त्यांच्या नावावर मतदान मिळवण्याचे आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हे योग्य नसल्याचे आसिफ शेख म्हणाले.
त्यांनी केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत पुढे आसिफ शेख म्हणाले, जे आहे ते आहे, आम्ही संविधानाला मानणारे आहोत आणि या देशावर प्रेम करणारे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु आता त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत आसिफ शेख?
आसिफ शेख यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) या राजकीय पक्षाची निर्मिती केली असून त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूकही लढवली होती. आसिफ शेख हे पूर्वी कॉंग्रेस पक्षात होते. कॉंग्रेस पक्षात असताना ते आमदार देखील होते. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात देखील प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला व अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
विधानसभा निवडणुकीत आसिफ शेख यांचा पराभव झाला होता. एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आसिफ शेख यांचा 162 मतांनी पराभव केला होता. तसेच आसिफ शेख यांनी स्थापन केलेल्या पक्षावर देखील आक्षेप नोंदवण्यात आला होता.