पावसाळा प्राण्यांच्या मॅटिंग पिरियडसाठी (प्रजनन) महत्त्वाचा असतो. यादरम्यान प्राणी चिडचिड आणि आक्रमक होतात. परिणामी, पर्यटकांवर हल्ल्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यातील ३ महिने (जुलै-सप्टंेबर) गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आ
.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय पावसाळ्यात प्राणी-पक्ष्यांचा मॅटिंग पिरियडमध्ये व्यत्यय आणल्यास ते पर्यटकांवर हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे अभयारण्य दरवर्षी तीन महिने बंद ठेवण्यात येते.
-समाधान पाटील, वनपाल, गौताळा.
प्राण्यांच्या ‘मॅटिंग’साठी पावसाळा असतो खास
पावसाळा हा प्राण्यांच्या मॅटिंग पिरियडसाठी खास मानला जातो. या मॅटिंग पिरियडमध्ये पक्षी किंवा प्राणी चिडचिड करतात, पर्यटकांनी अशा वेळी त्यांच्या मॅटिंग पिरियडमध्ये व्यत्यय आणला तर ते हल्ला करतात.