36 जिल्ह्यांतील 5 हजार सायकलस्वारांचा पंढरपुरात 1 तास रिंगण सोहळा: पहाटे 5 वाजता पंढरपुरात दाखल, सकाळी 8 वाजता नगर प्रदक्षिणा – Solapur News



राज्यभरातून शेकडो किमी अंतर कापून पंढरपूरला सायकलवारीने आलेल्या ३६ जिल्ह्यांतील १०० क्लबच्या ५ हजार सायलस्वारांचा अनुपम रिंगण सोहळा पार पडला. रविवारी सकाळी ८.३० ते ९.३० पर्यंत हा रिंगण सोहळा चालला. ‘याचि देही याचि डोळा’ हा रिंगण सोहळा अनेकांनी अनुभवल

.

सायकलवारीतील रिंगण सोहळ्याला चार वर्षांची परंपरा आहे. कर्नाटकातील विजापूर, छत्रपती संभाजीगरसह वेगवेगळ्या भागातील ५ हजार सायलस्वार पहाटे ५ वाजता पंढरपुरात दाखल झाले. सकाळी ८ वाजता नगर प्रदक्षिणा झाली. ८.३० वाजता सायकल रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. प्रारंभी क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी हिरवी झेंडी दाखवली. दीड तास म्हणजेच ९.३० वाजता हा रिंगण सोहळा पार पडला.

देशतील ५० सायकलपटूंचा सन्मान प्रत्येक जण वेगवेगळे छंद जोपासतात. त्यापैकीच एक म्हणजे सायकलिंग. काश्मीर ते कन्याकुमारी, घुमान, तिरुपती बालाजी अशा देशव्यापी मोहिमा राज्यातील ५० पेक्षा अधिक सायकलपटूंनी यशस्वी केल्या आहेत. अशा सायकलपटूंचा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील ३ सायकलपटूंचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24