Aurangzeb: ‘औरंगजेब हे पवित्र इंसान होते’; माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य


Ex MLA Shaikh Asif On Aurangzeb : औरंगजेब हा क्रूर नव्हता तो उत्तम शासक होता असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते. यानंतर आता आणकी एका माजी आमदाराने औरंगजेबाचं उदात्तीकरण केले आहे. औरंगजेब हे पवित्र इंसान होते धक्कादायक विधान केले आहे. आमदाराच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब किती क्रूर होता याचा इतिहास साक्षीदार आहे.  जुलमी मुघल शासक अशी त्याची ओळख आहे. मात्र, औरंगजेब हे पवित्र इंसान होते. टोपी शिवून ते आपला उदरनिर्वाह करत होते असे वक्तव्य या माजी आमदाराने केले आहे. आसिफ शेख (Shaikh Asif Shaikh Rashid) असे या आमदाराचे नाव आहे. आसिफ शेख हे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. मात्र, आता त्यांनी स्वत:चा पक्ष काढला आहे. ISLAM (Indian Secular Largest Assembly of Maharashtra) असे त्यांच्या या पक्षाचे नाव आहे. आसिफ शेख हे ISLAM पक्षाचे संस्थापक आहेत. 

मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कॉन्फरन्स च्या नंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबवर मुक्ताफळ उधळली आहेत.  औरंगजेब हे पवित्र इंसान होते. टोपी शिवून ते आपला उदरनिर्वाह करत होते असे आरिफ शेख म्हणाले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर,  औरंगजेब हे सर्व धर्मांना माननारे सर्वधर्मसमभाव असे होते. त्यांना बदनाम करण्यासाठी राजकारणासाठी त्यांचा नावाचा उपयोग केला जात आहे असा खळबळजक आरोपही आरिफ शेख यांनी केला.  यापूर्वी औरंगजेब हा क्रूर नव्हता तो उत्तम शासक होता अशी मुक्ताफळं अबू आझमी यांनी उधळली होती.. या विधानानंतर आझमी यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी टीकास्त्र डागल होते.  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24