‘नारायण राणेंकडून शिवसेनेत जाण्याचा अनेकदा प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पण…’, भास्कर जाधवांचा मोठा गौप्यस्फोट


Bhskar Jadhav On Narayan Rane: नारायण राणे 2014 साली शिवसेनेत येणार होते, असे विधान भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत म्हटले होते. याला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दुजोरा दिला आहे. नारायण राणे शिवसेनेत पुन्हा येण्यास इच्छुक होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना घ्यावं अशाप्रकारचे त्यांचे प्रस्ताव होते. पण यातील खरं खोट मला माहिती नाही, त्याचा माझ्याकडे पुरावा नाही. पण मी ऐकलं होतं राणे इच्छुक होते, असे भास्कर जाधव यांनी टू द पॉइंट मुलाखतीत सांगितले. ते काँग्रेसमध्ये गेले पण त्यांचं काँग्रेसमध्ये जमत नव्हतं. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. पण त्यांच्या पक्षात मुलगापण गेला नाही. तो पक्ष एका वर्षाच्या आत बंद झाला. यानंतर मला भाजपमध्ये घ्या असं म्हणत होते, राणेंना आम्ही घेऊ पण त्यांच्या 2 मुलांचं काय करायचं. त्यांना पक्षात घ्यायचं की नाही ते ठरवा पण त्यांना घेऊन तुमचा पक्ष चालणार नाही, असे मी त्यांना सांगितले. 

शिवसेना का सोडली होती?

बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना का सोडली? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. माझ वय 68 वर्षे आहे. मी आक्रमक आहे. ओरिजनल शिवसेनेचा गुणधर्म माझ्यात दिसतो. तोच आक्रमकपण, प्रमुखावर कोणी बोललं तर तुटून पडणे. आजही मी तितकाच आक्रमक आहे. आज मी असा आहे तर त्या काळात मी कसा असेन? कोकणात सर्वात जास्त शिवसेनेसाठी केसेस घेतलेला मी होतो. माझी वैयक्तिक केस नव्हत्या. सर्व शिवेसेनेसाठी घेतल्या होत्या. त्यामुळे डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. 

‘उद्धव ठाकरे भेटत नाहीत, म्हणून तुम्ही नाराज होतात?’ या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, तो इतिहास झाला. त्याची खपली काढण्यात अर्थ नाही. 16 सप्टेंबर 2004 रोजी मला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली पण माझी उमेदवारी काढली. कोणाला उमेदवारी द्यावी, हा निर्णय पक्षनेतृत्वाने घ्यायचा असतो. पण एवढी वर्षे काम केल्यानंतर बोलून निर्णय घ्यायला हवं होतं, असं मला वाटल्याचे भास्कर जाधव म्हणाले. 

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

राज्यात महाविकास आघाडीचे 2019 मध्ये सरकार आल्यावर भास्कर जाधव यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. पवारांची साथ सोडल्यामुळे पवारांनी भास्कर जाधव यांना मंत्रीपद मिळू दिले नाही का? आजवरचा इतिहास आहे की पवारांना जे सोडून गेले त्यांना भविष्यात कोणतंही पद मिळालं नाही.  या प्रश्नावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, शरद पवार हा मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांनी माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल असे  मला वाटत नाही.  पण त्यांनी जर केले असेल तर ते बरोबर केलं आहे. पवार साहेबांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अशी कबुली जाधव यांनी दिली. पवारांनी माझ्या मंत्रीपदाला जर विरोध केला असेल तर त्यामागचे कारण सांगताना जाधव म्हणाले, मी शिवसेनेत होतो, त्यावेळी उमेदवारी मिळण्याची लायकी नसताना ज्या माणसाने मला राष्ट्रवादीत घेतलं. राज्याचं सरचिटणीस केलं. विधान परिषद मला दिली, निवडून आणलं. विधानसभा दिली, निवडून आणलं. मला मंत्रीमंडळात घेतलं. मला पक्षाचा अध्यक्ष केला. त्या व्यक्तीने मी पक्ष सोडल्यावर माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल. तर ते बरोबरच केलं. शेवटी मला माझं प्राक्तन भोगलं पाहिजे. माझ्याकडून चूकच झाली होती. पवारांना सोडून जाणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशी कबुली भास्कर जाधव यांनी या कार्यक्रमात दिली. 

भास्कर जाधव पुढे म्हणाले,  हे मी आज शिवसेनेत असताना बोलतो आहे. कदाचित या बोलण्याचे मला परिणाम भोगावे लागतील, हेही मला माहिती आहे. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो पवार साहेबांना नक्की हे केलं नसेल. कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24